राजगृहात पन्नास हजार ग्रंथांचं संग्रहालय आणि पंचवीस हजारांपेक्षा जास्त जगभरातील महान ग्रंथांचं परदेशातून भारतात येतानाचं डुबलेलं जहाज इतका पुस्तकांचा खजिना बाळगणाऱ्या आणि पुस्तकांप्रति असीम प्रेम असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ मनुस्मृतीसारखा एकच ग्रंथ जाळावास का वाटला? त्यांनी पोटाची भूक मारून ज्ञानाची भूक भागविण्यासाठी जगभरातील ज्ञानाचं परिमार्जन करून तसंच रस्त्यावरील स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात वाचन करून स्वत:ची प्रज्ञा प्रगल्भ करणाऱ्या या प्रकांड पंडितानं मनुस्मृतीचा विध्वंस का करावा? का त्याचं मनुशी वैर होतं? नाही, मनू तर कित्येक शतकं अगोदर निर्मिला गेला होता. डॉ. आंबेडकरांच्या वाचनात जेव्हा हा ग्रंथ आला तेव्हा त्यांना या ग्रंथातील(?) विषमतेचे जहर किती ठासून भरलेलं आहे हे लक्षात आलं. जगाच्या तुलनेत केवळ भारत देशातच इतकं बिभित्स चित्र होतं की, इथे पशुपक्षांना जगण्याचा अधिकार होता. पण तुमच्या आमच्यासारख्या चालत्याबोलत्या जीवंत हाडामांसाच्या माणसांना मात्र नव्हता. किती हा विरोधाभास? बरं याचे क्षणोक्षणी चटके सोसलेल्या या महान तपस्वीने शेवटी स्वत:ला मानवधर्मशास्त्र म्हणवून घेणाऱ्या मनुस्मृतीनामक विषमतेच्या जहराची २५ डिसेंबर १९२७ रोजी राखरांगोळी केली आणि त्यास सुरक्षित पर्याय म्हणून भारतीय संविधान निर्माण करून बहुजनांचा उध्दार केला.
अतुलनीय अशा भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास तर केलाच शिवाय आपल्याच देशातील प्राचिन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरांचा, राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडींचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करताना त्यांना एक अद्भुत अमानवी कठोर नियमांची स्मृती आढळून आली. ती मनुस्मृती होय. मात्र आजवर कोणीही या ग्रंथाचा इतका चिकित्सकपणे अभ्यास न करता आणि आपले परखड मत जगासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय कोणीही मांडले नाही. गेल्या शतकातील समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांनीही ‘जाळून टाकावा मनुग्रंथ’ असे म्हटले आहे. या गुरूच्या मनातील चीड शिष्याच्या थेट ह्रदयात जावून भिडली आणि इतकेच नाही तर त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर मनुस्मृतीला दुसरा पर्याय सार्वभौमत्वाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व असलेले संविधान निर्मिले आणि समस्त बहुजनांवर आणि सर्व स्त्रीयांवर मग त्या स्त्रीया ब्राम्हण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो वा शुद्र सर्व स्तरातील स्त्रीयांना न्याय्यहक्क मिळवून देऊन जणू त्यांना दुसरा स्वाभिमानाचा जन्म बहाल केला.
अतुलनीय अशा भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास तर केलाच शिवाय आपल्याच देशातील प्राचिन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरांचा, राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडींचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करताना त्यांना एक अद्भुत अमानवी कठोर नियमांची स्मृती आढळून आली. ती मनुस्मृती होय. मात्र आजवर कोणीही या ग्रंथाचा इतका चिकित्सकपणे अभ्यास न करता आणि आपले परखड मत जगासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय कोणीही मांडले नाही. गेल्या शतकातील समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांनीही ‘जाळून टाकावा मनुग्रंथ’ असे म्हटले आहे. या गुरूच्या मनातील चीड शिष्याच्या थेट ह्रदयात जावून भिडली आणि इतकेच नाही तर त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर मनुस्मृतीला दुसरा पर्याय सार्वभौमत्वाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व असलेले संविधान निर्मिले आणि समस्त बहुजनांवर आणि सर्व स्त्रीयांवर मग त्या स्त्रीया ब्राम्हण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो वा शुद्र सर्व स्तरातील स्त्रीयांना न्याय्यहक्क मिळवून देऊन जणू त्यांना दुसरा स्वाभिमानाचा जन्म बहाल केला.
कधी कधी गंमतीनं असं वाटतं की डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी सकपाळांनी याच महान कार्यासाठी तर नाही ना भिवाला संस्कृत शिकावयास लावले? कारण आजतागायत कोणीही या स्मृतींना हात लावण्यास धजावला नाही; तो विडा फक्त डॉ. बाबासाहेबांनीच उचलला. जगात एखाद्या गोष्टीला नकारात्मक शिक्कामोर्तब करणात्यांची संख्या कमी नाही; पण याने तर नकारातून सकारात्मक असे संविधान निर्मिले आणि आज चातुवर्ण्यव्यवस्थेच्या राक्षसी गरकेतून आपली सहिसलामत सुटका केली. हजारो वर्षांचा जुना बौध्द साम्राज्याचा लोप पावलेला इतिहास शोधून तो परत भारतात सहिसलामत परत आणणाऱ्याला त्यानंतरचे कर्मकांड शोधून काढणं आणि मानवाच्या पशुहीन जगण्याला न्याय मिळवून देणं यात त्यांच्यासाठी काहीच कठीण नव्हतं. कदाचित या वास्तववादी सृष्टीलाही हेच अपेक्षित असावं. कारण हजारो वर्षे या माणूसरुतींच्या कपट विळख्यात माणूस पार अडकून गेला होता. चातुर्वर्ण्यव्यवस्था डंका पिटवणाऱ्या या मनुस्मृतीने सर्वात उच्चपदी ब्राह्मणाला ठेवलं, त्याच्याखाली दुसऱ्या क्रमांकावर मराठ्यांना ठेवलं, तिसऱ्या क्रमांकावर वाण्यांना ठेवलं आणि सर्वात शेवटी शूद्रांना ठेवलं. पहिल्या तीन जातींची या शेवटच्या जातीने विनातक्रार कायमची सेवा करायची. बरं या शूद्र जातीचे लोक म्हणजे नक्की कोण? शुद्रांसाठी बाबासाहेब इतके झगडले म्हणजे नक्की कुणासाठी झगडले? कुणासाठी ह्या ग्रंथाची जाळून होळी केली? इथेच बर्याचजणांची गफलत होते. बहुतेकांना वाटतं की बाबासाहेबांनी महार किंवा बौद्धांसाठी हे सारं घडवून आणलं. पण खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. मनुस्मृतीच्या चौथ्या व्यवस्थेतील शूद्र म्हणजे आजच्या इतर मागासवर्गीय जाती (Other Backward Caste) म्हणजे ओबीसी. या ओबीसीमध्ये ३४६ जातींचा समावेश होतो. त्यामध्ये कुणबी, शिंपी, सोनार, रंगारी, भिस्ती, दर्जी, कुरुबर , तांबट, कासार, सुतार, आगरी, भावसार, तेली,माळी, कुंभार, न्हावी, ख्रिश्चन, परिट यांसारख्या ३४६ जातींच्या न्याययहक्कांसाठी डॉ. आंबेडकरांनी हा लढा पुकारला. कारण तितकीच दयनीय होती. म्हणूनच या अमानुष ग्रंथाची डॉ. आंबेडकरांनी चिता पेटविली.
या चातुर्वण्य व्यवस्थेत आज बौद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचा अंतर्भाव नाही. अतिशूद्र किंवा अत्यंज किंवा अस्पृश्य वैदिकांच्या वा हिंदूंच्या समाजरचनेच्या वेशीबाहेरच आहे. अस्पृश्य हा लोकसमूह वर्णव्यवस्थेत नाही याचा अर्थ तो धर्माच्याही बाहेर आहे.
हिंदू आणि बौध्द यांच्या भांडणातून अस्पृश्यता निर्माण झाली असे डॉ. आंबेडकर म्हणतात. शेतीच्या शोधानंतर भटक्या जमाती एके ठिकाणी वस्त्या करून राहू लागल्या. त्यांच्या जास्त उत्पन्नामुळे त्यांच्यावर इतर भटक्या जमाती स्वाऱ्या करीत. त्यांच्यात वारंवार होणाऱ्या युध्दामुळे बऱ्याच जमातींची वाताहत झाली. अशा लोकांना सधन असलेल्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी जवळ केले. त्यांना गावाच्या वेशीजवळ जागा देऊन समाजातील हीन व गलिच्छ कामे त्यांना करायला लावली. यातून अस्पृश्यतेचा उदय झाला. त्यांनी गावकुसाबाहेर राहावे. प्रतावरील कपडेच त्यांनी वापरावे. लोखंडाचे दागिने घालावेत. त्यांनी बेटीव्यवहार स्वजातीतच करावा, त्यांना फुटक्या भांडयातून अन्न द्यावे. त्यांनी रात्रीच्या वेळी फिरू नये. राजाच्या आज्ञेनेच, त्याचे तिन्ह धारण करून दिवसा कामासाठी गावात हिंडावे, बेवारस प्रेतांची वेशीबाहेर नेवून विल्हेवाट लावावी. अशाप्रकारचे हे अमानवी कायदे मनुस्मृतीमध्ये आहेत. अस्पृश्यतेची ही निर्मिती बुध्दपूर्वकाळातच घडून आली होती. मात्र तथागत गौतम बुद्धांनी अस्पृश्यतेला चातुर्वण्याच्या सामाजिक विषमता नष्ट केली. याच आपल्या गुरूच्या तत्वाची कास धरून 1956 साली डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांना बौद्ध धम्माची दीक्षा त्यांचे वेशीबाहेर गेलेले अस्तित्व परत मिळवून दिले.
ब्राम्हणांचे अधिकार :-
मनुस्मृतीच्या नियमानुसार शिक्षण ब्राम्हणांनी घ्यावे, युद्ध करणे, प्रजारक्षण क्षत्रियांनी करावे, व्यापार व शेती वैश्यांनी करावे आणि या ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांची कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे म्हणे देवाने नेमून दिलेले शुद्राचे काम होय, ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ आहे कारण तो पुराणातील ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मला. त्याच्यामध्ये ब्रम्ह राहते. पृथ्वीवर असणारे सर्व द्रव्य ब्राम्हणाचेच असते. दहा वर्षांचा ब्राम्हण मुलगा शंभर वर्षे वयाच्या क्षत्रियालाही बापासमान असतो, शूद्राचे प्रेत दक्षिण दिशेने, वैश्याचे प्रेत पश्चिमेच्या दिशेने, क्षत्रियाचे प्रेत उत्तर दिशेने आणि ब्राम्हणाचे प्रेत सूर्य उगावतो त्या पूर्व दिशेने न्यावे, ब्राम्हणाने कधीही सेवा करू नये ब्राम्हणाने कर्ज घेतल्यास त्याच्याकून अत्यल्प असे शेकडयामागे २ रूपये व्याज घ्यावे. हाच दर क्षत्रियासाठी ३ रूपये, वैश्यासाठी ४ रूपये तर शूद्रासाठी ५ रूपये आहे अशी तफावत मनुस्मृतीने केलेली आहे. मांस, लाख व मीठ विकल्यामुळे ब्राम्हण तात्काळ पतित होतो आणि दूध विकल्यामुळे तो शूद्र होतो. जगातली सर्व संपत्ती ब्राम्हणाची आहे, ब्राम्हणाला उपाशी मरू देऊ नये कारण त्यामुळे सारे राष्ट्रच नष्ट होते. म्हणून राजांनी ब्राम्हणांना भरपूर दान दक्षिणा द्याव्यात, शुद्राकडील सर्व पैसे संपत्ती ब्राम्हणाने काढून घ्यावी, ब्राम्हणांच्याबाबतीत राजाने क्षमाशील वृत्ती ठेवावी, इतरांनी खोटी साक्ष दिली तर दंड घ्यावा आणि त्यांना हद्दपारही करावे. ब्राम्हणाला केवळ घराबाहेर घालवावे. ब्राम्हणहत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही, ब्राम्हणाचा अवमान करू नये, अग्नीला ज्यांनी गिळंकृत केले, समुद्राला पिऊन टाकले, चंद्राला लुप्त करणारे ब्राम्हण कुणालाही नष्ट करू शकतात, ब्राम्हण ज्ञानी असला काय वा नसला काय तो दैवतच आहे,
सर्व प्राणीमात्रांचा धर्मेश्वर ब्राम्हण असल्यासने तो जगात सर्वांमध्ये श्रेष्ठ जन्म घेत असतो. श्रेष्ठता व कुलीनता हे गुण ब्राम्हणात असल्याकारणाने पृथ्वीवर असणारे सर्व द्रव्य ब्राम्हणालाच योग्य व त्याचेच आहे.
पुढील श्लोक तर हास्यास्पदच वाटतो. ब्राह्मणाला श्रेष्ठत्व द्यायच्या भ्रमात वयोमानचाही मुद्दा लक्ष्यात घेण्यासारखा आहे.
शुद्राचा सर्व पैसा अडका ब्राम्हणाने काढून घ्यावा. कारण शूद्राचे स्वत:चे असे काहीही नसते. हे मनुस्मृती या श्लोकातून सांगते.
या चातुर्वण्य व्यवस्थेत आज बौद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचा अंतर्भाव नाही. अतिशूद्र किंवा अत्यंज किंवा अस्पृश्य वैदिकांच्या वा हिंदूंच्या समाजरचनेच्या वेशीबाहेरच आहे. अस्पृश्य हा लोकसमूह वर्णव्यवस्थेत नाही याचा अर्थ तो धर्माच्याही बाहेर आहे.
हिंदू आणि बौध्द यांच्या भांडणातून अस्पृश्यता निर्माण झाली असे डॉ. आंबेडकर म्हणतात. शेतीच्या शोधानंतर भटक्या जमाती एके ठिकाणी वस्त्या करून राहू लागल्या. त्यांच्या जास्त उत्पन्नामुळे त्यांच्यावर इतर भटक्या जमाती स्वाऱ्या करीत. त्यांच्यात वारंवार होणाऱ्या युध्दामुळे बऱ्याच जमातींची वाताहत झाली. अशा लोकांना सधन असलेल्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी जवळ केले. त्यांना गावाच्या वेशीजवळ जागा देऊन समाजातील हीन व गलिच्छ कामे त्यांना करायला लावली. यातून अस्पृश्यतेचा उदय झाला. त्यांनी गावकुसाबाहेर राहावे. प्रतावरील कपडेच त्यांनी वापरावे. लोखंडाचे दागिने घालावेत. त्यांनी बेटीव्यवहार स्वजातीतच करावा, त्यांना फुटक्या भांडयातून अन्न द्यावे. त्यांनी रात्रीच्या वेळी फिरू नये. राजाच्या आज्ञेनेच, त्याचे तिन्ह धारण करून दिवसा कामासाठी गावात हिंडावे, बेवारस प्रेतांची वेशीबाहेर नेवून विल्हेवाट लावावी. अशाप्रकारचे हे अमानवी कायदे मनुस्मृतीमध्ये आहेत. अस्पृश्यतेची ही निर्मिती बुध्दपूर्वकाळातच घडून आली होती. मात्र तथागत गौतम बुद्धांनी अस्पृश्यतेला चातुर्वण्याच्या सामाजिक विषमता नष्ट केली. याच आपल्या गुरूच्या तत्वाची कास धरून 1956 साली डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांना बौद्ध धम्माची दीक्षा त्यांचे वेशीबाहेर गेलेले अस्तित्व परत मिळवून दिले.
ब्राम्हणांचे अधिकार :-
मनुस्मृतीच्या नियमानुसार शिक्षण ब्राम्हणांनी घ्यावे, युद्ध करणे, प्रजारक्षण क्षत्रियांनी करावे, व्यापार व शेती वैश्यांनी करावे आणि या ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांची कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे म्हणे देवाने नेमून दिलेले शुद्राचे काम होय, ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ आहे कारण तो पुराणातील ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मला. त्याच्यामध्ये ब्रम्ह राहते. पृथ्वीवर असणारे सर्व द्रव्य ब्राम्हणाचेच असते. दहा वर्षांचा ब्राम्हण मुलगा शंभर वर्षे वयाच्या क्षत्रियालाही बापासमान असतो, शूद्राचे प्रेत दक्षिण दिशेने, वैश्याचे प्रेत पश्चिमेच्या दिशेने, क्षत्रियाचे प्रेत उत्तर दिशेने आणि ब्राम्हणाचे प्रेत सूर्य उगावतो त्या पूर्व दिशेने न्यावे, ब्राम्हणाने कधीही सेवा करू नये ब्राम्हणाने कर्ज घेतल्यास त्याच्याकून अत्यल्प असे शेकडयामागे २ रूपये व्याज घ्यावे. हाच दर क्षत्रियासाठी ३ रूपये, वैश्यासाठी ४ रूपये तर शूद्रासाठी ५ रूपये आहे अशी तफावत मनुस्मृतीने केलेली आहे. मांस, लाख व मीठ विकल्यामुळे ब्राम्हण तात्काळ पतित होतो आणि दूध विकल्यामुळे तो शूद्र होतो. जगातली सर्व संपत्ती ब्राम्हणाची आहे, ब्राम्हणाला उपाशी मरू देऊ नये कारण त्यामुळे सारे राष्ट्रच नष्ट होते. म्हणून राजांनी ब्राम्हणांना भरपूर दान दक्षिणा द्याव्यात, शुद्राकडील सर्व पैसे संपत्ती ब्राम्हणाने काढून घ्यावी, ब्राम्हणांच्याबाबतीत राजाने क्षमाशील वृत्ती ठेवावी, इतरांनी खोटी साक्ष दिली तर दंड घ्यावा आणि त्यांना हद्दपारही करावे. ब्राम्हणाला केवळ घराबाहेर घालवावे. ब्राम्हणहत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही, ब्राम्हणाचा अवमान करू नये, अग्नीला ज्यांनी गिळंकृत केले, समुद्राला पिऊन टाकले, चंद्राला लुप्त करणारे ब्राम्हण कुणालाही नष्ट करू शकतात, ब्राम्हण ज्ञानी असला काय वा नसला काय तो दैवतच आहे,
शूद्रांचे अधिकार :-
शूद्रांनी उष्टे अन्न खावे, जुनी वस्त्रे घालावीत. धान्याचा उरलेला तुकडा व जुने अंथरूण वापरावे. धर्मकार्यात शूद्रांनी पंच महायज्ञ करावा पण वैदिक मंत्र म्हणू नये. शूद्राने आवश्कतेपेक्षा धनसंचय करू नये. त्याने ब्राम्हणाला धर्माचा उपदेश केला तर त्याच्या कानात व तोंडात तापलेले तेल आतावे हेही मनुस्मृती सांगते. शूद्राने कोणाला शिवी दिल्यास त्याची जीभ छाटावी व त्याच्या मुखात दहा अंगुळे लांबीचा लोखंडाचा तापलेला खिळा घालावा (8 : 271) शूद्राने ब्राम्हणास मारण्याकरिता काठी उचलली, हात उचलला वा लाथा मारल्या तर तो हात वा पाय तोडणेच योग्य होय. ब्राम्हणासोबत आसनावर बसणाऱ्या शूद्राच्या कंबरेवर तप्त लोखंडाचा चट्टा देऊन त्याला हद्दपार करावे किंवा त्याचे कुल्ले कापावेत. ब्राम्हणापुढे गर्वाने थुंकणाऱ्या शूद्राचे राजाने ओठ कापावे. ब्राम्हणासमोर लघवी करणाराचे लिंग कापावे आणि तो ब्राम्हणासमोर पादला तर त्याचे गुद कापावे. गर्वाने ब्राम्हणाचे केस धरणाऱ्या शूद्राचे हात विचार न करता छाटावे किंवा शूद्राने ब्राम्हणाला मारण्यासाठी त्याचे पाय पकडले, दाढी पकडली, मान धरली किंवा वृषण पकडले तर राजाने त्या शूद्राचे दोन्ही हात तोडून टाकावे. मारहाण करणे, द्रव्यहरण करणे याप्रकारे ब्राम्हणाला त्रास देणाऱ्या शूद्राला राजाने हालहाल करून ठार मारावे असे अत्यंत अमानुष पध्दतीचे धर्मशास्त्र हे मनूस्मृतीत आहे.
प्रसिद्ध लेखक डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?’ या पुस्तकामध्ये मनुस्मृती जाळण्याबाबतचे त्यांनी तपशिलवार विश्लेषण केले आहे.
मनुस्मृतीमध्ये विश्वनिर्मितीचे खोटे दैवी कथन :-
मनुस्मृती म्हणते की, पृथ्वी, येथील मानव आणि जातीवर्णव्यवस्था या सर्वच गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत. हे जग प्रलयाचे वेळी अंधारात गडप झाले होते. तिथे ते निश्चेष्ट होऊन पडले होते. प्रलय संपलयानंतर परमेश्वर निर्माण झाला. मग त्याने प्रजोत्पती करण्यासाठी पाणी निर्माण होण्याची इच्छा करताच पाणी निर्माण झाले. त्यात त्याने शक्तीरूप बीज पेरले. त्या बीजापासून सूर्यासारखे तेज असणारे एक सोन्यासारखे अंडे निर्माण झाले. त्यातच प्रत्यक्ष ब्रम्हदेवाची निर्मिती झाली. ब्रम्हदेव त्या अंडयात एक वर्ष राहून नंतर स्वत:च्या इच्छेनेच त्या अंडयाची दोन शकले करून बाहेर आला. अंडयाच्या वरच्या शकलापासून स्वर्ग आणि खालच्या शकलापासून पृथ्वी निर्माण करून त्यात आकाश, अष्ट दिशा आणि जळाब्धीची निर्मिती केली. त्यानंतर मन, अहंकार, क्रोध आणि सर्व प्राणिमात्रांची देखील निर्मिती केली. त्याने पूर्वी जशी सृष्टी प्रचलित होती तशीच पुन्हा निर्माण केली. दिवस, महिने, ऋतु, नक्षत्रे, ग्रह, नद्या, समुद्र, पर्वत अशी सर्व सृष्टी त्याने निर्माण केली. परमेश्वर पुन्हा पुन्हा जगाची निर्मिती करतो. पुन्हा प्रलयाच्या वेळी उपसंहार करतो. हे सर्व रसभरीत वर्णन या सनातनी मनुसमृतीमध्ये आढळते. मग जर प्रलयापूर्वी सृष्टी जशी प्रचलित होती तशीच परमेश्वराने निर्माण केली याचा अर्थ या सृष्टीत असलेल्या वर्णव्यवस्था, स्त्री-पुरूष भेद या गोष्टी या पूर्वीच्याही सृष्टीत होत्या असे म्हणावे लागेल. ब्रम्हाने त्याच्या शरीराचे अर्धे अर्धे असे स्त्री व पुरूष दोन निर्माण केले. त्या स्त्रीपासून मैथुनधर्माने विराट नावाचा पुरूष निर्माण केला. मन हा या विराट पुरूषाचा मुलगा आहे. हे कमी की काय म्हणून त्याच्याही पुढे जाऊन मनुस्मृती सांगते की, ब्रम्हदेवाने मुखापासून ब्राम्हण, बाहूपासून क्षत्रिय, मांडीपासून वैश्य व पायापासून शुद्रांची उत्पत्ती केली. ब्रम्हाने वेद निर्माण केले. यामध्ये ब्राम्हणाचे सर्वश्रेष्ठत्व कायम रहावे म्हणून आणि इतर सर्व जातीवर्गाला दुय्यम दर्जा शाबीत रहावा या दुष्ट आणि अमानुष हेतूने काल्पनिक आणि चमत्कारीक गोष्टी मनुने सांगून लोकांच्या मनात एक भिती निर्माण केली. याच भितीपोटी लोक आंधळेपणाने या भ्रमाला पवित्र मानू लागले ते आजतगायत.
मनुस्मृती अशी जाळली :-
रायगड जिल्ह्यातील महाड येथे सत्याग्रहासाठी डॉ. आंबेडकर आले होते. सत्याग्रहाच्या याच बैठकीत मनुस्मृतीबाबत ठराव मांडण्यात आला. सखोल अभ्यासाअंती अतिशय नियोजनबध्दतेने डॉ. बाबासाहेबांनी २५ डिसेंबर 1927 ला महाड येथे परिषदेसाठी तयार केलेल्या मंडपात मनुस्मृतीचे दहन केले. डॉ. आंबेडकरांनी परिषदेच्या या मंडपाच्या दारात शृंगारलेल्या वेदीवर रात्री ९ वाजता एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन केले.
टीकाकारांना आंबेडकरांचे सडेतोड उत्तर :-
त्यानंतर बाबासाहेबांनी जाहीरपणे आपल्या ३ फेब्रुवारी १९२८ च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात मनुस्मृती जाळण्याचे कारण स्पष्ट केले. त्यावर ‘स्वराज्य’पत्राचे संपादक रा. भुस्कुटे याबाबत आक्षेपार्ह पत्र पाठविले. त्यास बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिले ते असे – “आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरीता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. 158 :2) रिडल्स इन हिंदुइझम (खंड ४) या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी १८ व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडलच MANU’S MADNESS म्हणजे ‘मनूचा वेडेपणा’ या नावाने लिहून चिकित्सा केली आहे. तसेच त्यांनी बाराव्या खंडातही (पृ. 719-724) मनुस्मृतीची समीक्षा केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . “Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a ‘living past’ and therefore as really present as any present can be.” डॉ. आंबेडकरांच्या मतानुसार मनुसमृती हा वर्तमानकाळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. याचा अर्थ असा की मनुसमृतीची निर्मिती इ.स. च्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकविलेली अंधश्रध्दा आणि परस्परतुच्छता या गोष्टी आजही कायम आहेत.
मनुस्मृती अशी जाळली :-
रायगड जिल्ह्यातील महाड येथे सत्याग्रहासाठी डॉ. आंबेडकर आले होते. सत्याग्रहाच्या याच बैठकीत मनुस्मृतीबाबत ठराव मांडण्यात आला. सखोल अभ्यासाअंती अतिशय नियोजनबध्दतेने डॉ. बाबासाहेबांनी २५ डिसेंबर 1927 ला महाड येथे परिषदेसाठी तयार केलेल्या मंडपात मनुस्मृतीचे दहन केले. डॉ. आंबेडकरांनी परिषदेच्या या मंडपाच्या दारात शृंगारलेल्या वेदीवर रात्री ९ वाजता एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन केले.
टीकाकारांना आंबेडकरांचे सडेतोड उत्तर :-
त्यानंतर बाबासाहेबांनी जाहीरपणे आपल्या ३ फेब्रुवारी १९२८ च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात मनुस्मृती जाळण्याचे कारण स्पष्ट केले. त्यावर ‘स्वराज्य’पत्राचे संपादक रा. भुस्कुटे याबाबत आक्षेपार्ह पत्र पाठविले. त्यास बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिले ते असे – “आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरीता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. 158 :2) रिडल्स इन हिंदुइझम (खंड ४) या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी १८ व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडलच MANU’S MADNESS म्हणजे ‘मनूचा वेडेपणा’ या नावाने लिहून चिकित्सा केली आहे. तसेच त्यांनी बाराव्या खंडातही (पृ. 719-724) मनुस्मृतीची समीक्षा केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . “Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a ‘living past’ and therefore as really present as any present can be.” डॉ. आंबेडकरांच्या मतानुसार मनुसमृती हा वर्तमानकाळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. याचा अर्थ असा की मनुसमृतीची निर्मिती इ.स. च्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकविलेली अंधश्रध्दा आणि परस्परतुच्छता या गोष्टी आजही कायम आहेत.
मनुस्मृती दहनामागचा हेतू :-
मनुस्मृतीने हजारो वर्षे लोकांच्या मनावर उच्चनीचतेच्या विषमतेचे जहर पाजल्यामुळे लोकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या गोष्ट अस्तित्वात असू शकतात हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. 'गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल,' या डॉ. बाबासाहेबांच्याच गर्जनेने मनुस्मृती जाळणे म्हणजे लोकांची ही मनुवादी समजूत जाळणे होय. शूद्रांनी फक्त आपल्या वरच्या तीन वर्णांची विशेषत: ब्राम्हणांची सेवा करावी. असे केल्याने त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटतो आणि आणखी दुसरा फायदा म्हणजे शुद्राला स्वर्गप्राप्ती होते. पशूप्रमाणे जीवन जगणाऱ्या, स्वत:चं मन मारून फक्त ब्राम्हणांची सेवा करणारे शूद्रांनी आवश्यक तेवढीच संपत्ती बाळगावी. त्यापेक्षा अधिक संपत्ती शूद्रांनी बाळगली तर ब्राम्हणांसाठी ते घातक ठरते हे मनुस्मृती सांगते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ह्या लोकतंत्राच्या सूत्रांचा त्या विकृत मनुस्मृतीत अंतर्भाव असणे शक्यच नसल्यामुळे हा कायदा जाळून लोकांची मनं बदलणे हे डॉ. आंबेडकरांना तीव्रपणे वाटले. समता जाळणाऱ्या, माणुसकी जाळणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करून त्यांनी लोकांच्या मनात भरलेली विषमता जाळून टाकली.
हल्लीच गेल्या काही दिवसात व्हॅट्सऍपवर एक माथेफिरू संविधान जाळताणाचा विडिओ व्हायरल झाल्याचं सर्वांनी पाहिलं असेल. मधेमधे तर दुर्दैवाने आंबेडकरांच्या पुतळ्यावर काहीतरी फ़ेकतानाचे हेच तरुण ज्यांना डॉ. आंबेडकराणीच जगवलं. पण या तरुणांना इतिहास माहित नाही म्हणून असे हे उपद्व्याप करतात. मधेच कुठेतरी पेपरात वाचलं की मनुस्मृतीच्या प्रती गुप्तपणे पुस्तकांच्या दुकानातुन वाटल्या जातायत. यावरून पुढे येणाऱ्या संकटाचा अंदाज येतो. कदाचित या राक्षसी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
डॉ. यशवंत मनोहर आपल्या डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? पृ. क्र. 22 मध्ये लिहितात, ‘संपत्तीमुळे माणूस स्वावलंबी होतो आणि शूद्राला तर स्वावलंबी, स्वयंपूर्ण होऊच द्यायचे नाही ही मनुसमृतीची भूमिका आहे. शूद्रांची योग्यता वाढणे, जीवनाच्या आर्थिक, शैक्षणिक, वाङमयीन अशा वर्ग क्षेत्रात तो स्वतंत्र आणि स्वयंभू होणे ब्राम्हणांसाठी धोक्याचे आहे. केवळ आपली सेवा करीत राहणारा आपला गुलाम गमावणे ब्रम्हणांना परवडण्यासारखे नाही. म्हणजे शूद्रांनी ज्ञान मिळवू नये, शूद्रांनी आर्थिकदृश्टया स्वयंपूर्ण होऊ नये हा मनुस्मृतीचा आदेश मानवाधिकारांच्या विरोधी आहे. शूद्रांना मूलभूत मानवी अधिकार देण्याला वा शूद्रांना माणूस म्हणून जगू देण्यालाच मनुस्मृतीचा नकार आहे. म्हणूनच ‘इति मानवे धर्मशास्त्र भृगुप्रोक्तायां…’ अशा शब्दांनी मनुस्मृतीच्या प्रत्येक अध्यायाची समाप्ती होत असली तरी मनुस्मृतीला मानवधर्मशास्त्र म्हणता येणे अजिबात शक्य नाही. ते ब्राम्हणधर्मशास्त्र आहे हेच मनुस्मृती इथून तिथून सर्वत्र सांगत आहे.
हल्लीच गेल्या काही दिवसात व्हॅट्सऍपवर एक माथेफिरू संविधान जाळताणाचा विडिओ व्हायरल झाल्याचं सर्वांनी पाहिलं असेल. मधेमधे तर दुर्दैवाने आंबेडकरांच्या पुतळ्यावर काहीतरी फ़ेकतानाचे हेच तरुण ज्यांना डॉ. आंबेडकराणीच जगवलं. पण या तरुणांना इतिहास माहित नाही म्हणून असे हे उपद्व्याप करतात. मधेच कुठेतरी पेपरात वाचलं की मनुस्मृतीच्या प्रती गुप्तपणे पुस्तकांच्या दुकानातुन वाटल्या जातायत. यावरून पुढे येणाऱ्या संकटाचा अंदाज येतो. कदाचित या राक्षसी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
डॉ. यशवंत मनोहर आपल्या डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? पृ. क्र. 22 मध्ये लिहितात, ‘संपत्तीमुळे माणूस स्वावलंबी होतो आणि शूद्राला तर स्वावलंबी, स्वयंपूर्ण होऊच द्यायचे नाही ही मनुसमृतीची भूमिका आहे. शूद्रांची योग्यता वाढणे, जीवनाच्या आर्थिक, शैक्षणिक, वाङमयीन अशा वर्ग क्षेत्रात तो स्वतंत्र आणि स्वयंभू होणे ब्राम्हणांसाठी धोक्याचे आहे. केवळ आपली सेवा करीत राहणारा आपला गुलाम गमावणे ब्रम्हणांना परवडण्यासारखे नाही. म्हणजे शूद्रांनी ज्ञान मिळवू नये, शूद्रांनी आर्थिकदृश्टया स्वयंपूर्ण होऊ नये हा मनुस्मृतीचा आदेश मानवाधिकारांच्या विरोधी आहे. शूद्रांना मूलभूत मानवी अधिकार देण्याला वा शूद्रांना माणूस म्हणून जगू देण्यालाच मनुस्मृतीचा नकार आहे. म्हणूनच ‘इति मानवे धर्मशास्त्र भृगुप्रोक्तायां…’ अशा शब्दांनी मनुस्मृतीच्या प्रत्येक अध्यायाची समाप्ती होत असली तरी मनुस्मृतीला मानवधर्मशास्त्र म्हणता येणे अजिबात शक्य नाही. ते ब्राम्हणधर्मशास्त्र आहे हेच मनुस्मृती इथून तिथून सर्वत्र सांगत आहे.
मनुस्मृतीचे विषमतेचे स्वरूप :
या मनुस्मृतीत एकूण बारा अध्याय आहेत.
1. जगाची उत्पत्ती, २) संस्कारविधि, व्रतचर्या व नमस्कारादि उपचार, 3) विवाह, महायज्ञ व श्राध्दकल्प, ४) वृत्तीचे लक्षण व स्नातक, ५) भक्ष्याभक्ष्यनिर्णय, आशौच व द्रव्यशुध्दिी, ६) वानप्रस्थ व यति यांचे धर्म, ७) राजांचे सर्व धर्म, ८) न्यायनिरूपण, ९) स्त्री-पुरूष धर्म, दायविभाग, द्युत, चोर व वैश्य-शूद्र धर्म, १०) संकर जाती व आपध्दर्म, ११) प्राश्चित विधी आणि १२) अध्यायाचे नाव आहे शुभाशुभ कर्मफल! या बारा अध्यायांमधील श्लोकांची संख्या 2684 एवढी आहे.
“सर्वस्यास्य तु सर्गस्य गुप्त्यर्थं स महाद्युति:
मुखबाहूरूपज्जानां पृथक्कर्माण्यकल्पयत्” (1:87)
अध्यापनमध्ययनं यजनं याजनं तथा
दानं प्रतिग्रहं चैव ब्राह्मणानामकल्पयत् (1:88)
प्रजानां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च
विषयेष्वप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासत: (1:89)
पशूनां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च
वणिक्पथं कुसीदं च वैश्यस्य कृषिमेव च (1:90)
एकमेव तु शूद्रस्य प्रभु: कर्म समादिशत्
एतेषामेव वर्णानां शुश्रूषामनसूयया (1:91)
शिकणे, शिकविणे, यजन, याजन, दान घेणे वा देणे ही ब्राम्हणांची कामे होत. प्रजारक्षण, दान देणे, यज्ञ, अध्यान व विषयासक्त नसणे ही क्षत्रियांची कामे. पुशपालन, दान, यज्ञ करणे, अध्यायन, व्यापार, सावकारी व शेती ही वैश्यांची कामे होत तर ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांची कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवाने नेमून दिलेले शुद्राचे काम होय.
“उत्तमाग्ङगोभ्दवाज्जैष्ठयाद्ब्रम्हणश्चैव धारणात्
सर्वस्यैवास्य सर्गस्य धर्मतो ब्राम्हण: प्रभु: (1:93)
ब्राम्हण हा या सृष्टीचा मुख्य आहे कारण तो सर्वांच्या आधी जन्मला. उत्तम अशा मुख अवयवापासून जन्मला व तो अध्ययन, अध्यापन करतो. चार वर्णांमध्ये मनुस्मृतीने ब्राम्हणांना सर्वश्रेष्ठ दर्जा दिलेला आहे.
“ब्राम्हणो जायमाने हि पृथिव्यामधिजायते
ईश्वर: सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तये” (1:99)
सर्व स्वं ब्राम्हणस्येदं यत्किंचिज्जगतीगतम्
श्रेष्ठयेनाभिजनेनदं सर्वं वै ब्राम्हणो$र्हति” (1:100)
सर्व प्राणीमात्रांचा धर्मेश्वर ब्राम्हण असल्यासने तो जगात सर्वांमध्ये श्रेष्ठ जन्म घेत असतो. श्रेष्ठता व कुलीनता हे गुण ब्राम्हणात असल्याकारणाने पृथ्वीवर असणारे सर्व द्रव्य ब्राम्हणालाच योग्य व त्याचेच आहे.
पुढील श्लोक तर हास्यास्पदच वाटतो. ब्राह्मणाला श्रेष्ठत्व द्यायच्या भ्रमात वयोमानचाही मुद्दा लक्ष्यात घेण्यासारखा आहे.
ब्राम्हणं दशवर्ष तु शतवर्ष तु भूमिपम्
पितापुत्रौ विजानीयाद्ब्राम्हणस्तु तयो: पिता” (2:135)
दहा वर्षे वयाचा ब्राम्हण मुलगा शंभर वर्षे वयाच्या क्षत्रियाला पित्याप्रमाणे होय. ही मनुस्मृतीची ब्राम्हणाला श्रेष्ठत्व देणारी भूमिका कोणी कशी मान्य करावी ?
ब्राम्हणांना समाजातले सर्वश्रेष्ठ स्थान आणि सर्वोच्च दर्जा कायम राखावा याची मनुस्मृती पानापानावर तरतूद करून ठेवते.
ब्राम्हणांना समाजातले सर्वश्रेष्ठ स्थान आणि सर्वोच्च दर्जा कायम राखावा याची मनुस्मृती पानापानावर तरतूद करून ठेवते.
ब्राम्हण: संभवेनैव देवानामपि दैवतम्
प्रमाणं चैव लोकस्य ब्रम्हात्रैव हि कारणम् (11:84)
केवळ ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याने त्याच्यामध्ये ब्रम्ह राहते. म्हणून त्यास देव मानावा.
“दक्षिणेन मृतं शुद्रं पुरध्वारेण निर्हरेत
पश्चिमोत्तरपूर्वैस्तु यथायोगं द्विजन्मन: (5:92)
शूद्राचे प्रेत दक्षिण दिशेने, वैश्याचे प्रेत पश्चिमेच्या दिशेने, क्षत्रियाचे प्रेत उत्तर दिशेने आणि ब्राम्हणाचे प्रेत मात्र जिकडून सूर्य उगावतो त्या पूर्वेकडील दिशेने न्यावे.
खालच्या तीन्ही वर्णातील माणसांची प्रेते वेगवेगळया तीन दिशांनी नेण्यासंबंधीचा निर्देश करून ब्राम्हणाचे प्रेत पवित्र समजल्या जाणाऱ्या पूर्वदिशेनेच न्यावे हा अतिशय हास्यास्पद श्लोक वाटतो. या दिशांच्या शुभ-अशुभाबाबत डॉ. नरेंद्र दाभोळकरही मिश्किलपणे म्हणतात-‘पुर्व दिशा म्हणजे इंग्रजीमधील ईस्ट(east). ईस्ट म्हणजे ईष्ट (शुभ) आणि पश्चिम दिशा म्हणजे वेस्ट आणि वेस्ट (waste) म्हणजे टाकावू.’
“सत्यानृतं तु वाणिज्यं तेन चैवापि जीव्यते
सेवा श्ववृत्तिराख्यता तस्मातां परिवर्जयेत्” (4:6)
सेवा करणे वा नोकरी करणे हे कुत्र्याचे जीणं म्हटलं जातं. त्यामुळे ब्राम्हणाने कधीही सेवा करू नये आणि खालच्या प्रतीचे धंदेही त्याने करू नयेत कारण त्यामुळे तो शुद्र होतो. त्यापेक्षा एकवेळ व्यापार करून ब्राम्हणाने उपजीविका करावी. ब्राम्हणाला कर्ज दिल्यास दर महिन्याला शेकडयामागे २ रूपये व्याज घ्यावे. हाच दर क्षत्रियासाठी ३ रूपये आहे. वैश्यासाठी ४ रूपये आहे तर शूद्रासाठी ५ रूपये आहे अशी तफावत मनुस्मृतीने केलेली आहे.
“सद्य: पततिमांसेन लाक्षया लवणेनच
त्रयहेण शूद्रो भवति ब्राम्हण: क्षीरविक्रयात” (10:92)
मांस, लाख व मीठ विकल्यामुळे ब्राम्हण तात्काळ पतित होतो आणि दूध विकल्यामुळे तीन दिवसात तो शूद्र होतो. ब्राम्हणाला सर्वच संदर्भात अशा विशेष सवलती दिलेल्या आहेत. मनुस्मृतीची ब्राम्हणांवर विशेष मर्जी असल्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी मनुस्मृतीने सर्व प्रकारच्या सोयी करून ठेवीत आहे हे खालील श्लोकात मनुस्मृती सांगते.
“द्विकं त्रिकं चतुष्कं चं पत्र्चकं च शतं समम्
मासस्य वृध्दिं गृण्हीयाद्वर्णानामनुपूर्वश:” (8:142)
जगातली सर्व संपत्ती ब्राम्हणाची आहे कारण तो श्रेष्ठ आणि उच्चकुलीत आहे हे पुढील श्लोकात मनू सांगतो.
“सर्व स्वं ब्राम्हणस्येदं यत्किंचिज्जगतीगतम्
श्रैष्ठयेनाभिजनेनेदं सर्व वै ब्राम्हणा$र्हति” (1:100)
हे ब्राम्हणाला दिलेले विशेषाधिकार आपणाला मनुस्मृतीत ठिकठिकाणी दिसतात असाच एक अधिकार म्हणजे भुकेने ब्राम्हणाला मरू न देणे. कारण त्यामुळे सारे राष्ट्रच नष्ट होते.
“यस्य राज्ञस्तु विषये श्रोतिय: सीदति क्षुधा
तस्यापि तत्क्षुधा राष्ट्रमचिरेणैव सीदति” (7:134)
असेच असेल तर राष्ट्र कोण नष्ट करेल? राजांनी ब्राम्हणांना भरपूर दान दक्षिणा द्याव्यात.
“विस्त्रब्धं ब्राम्हण: शूद्राद्द्रव्योपादानमाचरेत्
नहि तस्यास्ति किंचित्सवं भर्तुहार्यधनो हि स:” (8:417)
शुद्राचा सर्व पैसा अडका ब्राम्हणाने काढून घ्यावा. कारण शूद्राचे स्वत:चे असे काहीही नसते. हे मनुस्मृती या श्लोकातून सांगते.
“कौटसाक्ष्यं तु कुर्वाणांस्त्रीन्वर्णान्धार्मिको नृप:
प्रवासयेद्दण्डयित्वा ब्राम्हणं तु विवासयेत् (8:123)
ब्राम्हणांच्या संदर्भात राजाने क्षमाशील वृत्ती ठेवावी. ‘ब्राम्हणेषु क्षमान्वित:’ (7:32) इतर वर्णांच्या तुलनेने ब्राम्हणांना अत्यंत नाममात्र शिक्षा दिली जावी.
“ब्राम्हणवधाद्भूयानधर्मो विद्यते भुवि
तस्मादस्य वधं राजा मनसापि न चिन्तयेत्” (8:381)
इतरांनी खोटी साक्ष दिली तर दंडही घ्यावा आणि त्यांना हद्दपारही करावे. ब्राम्हणाला मात्र दंडही न घेता केवळ घराबाहेर घालवावे. ब्राम्हणहत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही म्हणून ब्राम्हणहत्येचा विचारही राजाने मनात आणू नये आहे मनुस्मृती सांगते.
ब्राम्हणांना विशेषाधिकार देणारे पुढील श्लोक बघा-
“परमप्यापदं प्राप्तो ब्राम्हणान्न प्रकोपयेत्
हे ह्येनं कुपिता हन्यु: सद्य: सबलवाहनम्” (9:313)
आपत्तीत सापडलेल्या राजानेही ब्राम्हणाचा अवमान करू नये तसेच झाले तर ते रागावतील आणि सैन्य, वाहने यांच्या साह्याने राजाचा नाश करतील.
“यै: कृत: सर्वभक्ष्यो $ ग्निरपेयश्य महादधि:
क्षयी चाप्यायित: सोम: को न नश्येत्प्रकोप्य तान्” (9:314)
ज्यांनी अग्नीला सर्वभक्षक केले, समुद्राला पिऊन टाकले, चंद्राला क्षयी आणि पुन्हा पूर्ण केले ते ब्राम्हण कुणाला नष्ट करू शकणार नाहीत? असा या श्लोकातून धमकीच देऊन ठेवलीय.
अविद्वांश्चैव विद्वांश्च ब्राम्हणो दैवतं महत्
प्रणीतश्चाप्रणीतश्चयथाग्निदैवतं महत्” (9:317)
अग्नी कुठेही ठेवला असला तरी तो देवताच असतो त्याप्रमाणे ब्राम्हण ज्ञानी असला काय वा नसला काय तो दैवतच आहे.
“एवं यद्यप्यनिष्ठेषु वर्तन्ते सर्वकर्मसु
सर्वथा ब्राम्हणा: पूज्या: परमं दैवतं हि तत्” (9:319)
ब्राम्हणांनी कितीही निंद्य कामे केली तरी ते मोठे दैवतच असल्याने पूज्यच असतात, शिवाय राजसभेत प्रवेश करण्याआधी राजाने ब्राम्हणाची पूजा करावी. ब्राम्हणांना देणग्या द्यावा (7:145, 7:201) असेही मनुस्मृती आवर्जून सांगते. ज्या ज्या क्षत्रिय लोकांनी वेदोक्त आचारधर्म, यज्ञ आणि ब्राम्हणांची पूजा केली नाही ते कसे शूद्र कोटीला गेले हे सांगताना मनुस्मृतीने पौंड्रक, औंड्र, द्रविड, कम्बोज, यवन, शक, पारद, पल्हव, चीन, किरात, दरद आणि खश या क्षत्रियांचा निर्देश केला आहे. (10:43, 44)
मनु स्वत:ला सर्वज्ञ मानतो :-
“य: कश्चित्कस्यचिध्दर्मो मनुना परिकीर्तित:.
सर्वो$भिहितो वेदे सर्वज्ञानमयो हि स:” (2:7)
त्याने सांगितलेला धर्म सर्व वेदात आहे हे या श्लोकात आहे.
विषमतेवर आधारलेली चार वर्णांची समाजरचना ही परमेश्वरानेच स्वत: निर्माण केलेली असल्यामुळे ती चिरंतन आहे, तिच्यात बदल करणे हा अधर्म ठरतो. वेदाच्या आणि स्मृतींच्या विरूध्द कोणी बोलू नये, वेद आणि स्मृती अमान्य करणाऱ्या, त्यांची निंदा करणाऱ्या नासितकाला धर्मबहिष्कृत करावे, चातुर्वर्ण्याची अभेद्य चौकट पवित्र मानावी ती कायम करावी असा अप्रत्यक्ष दबाव मनुस्मृतीने टाकलेला आहे. म्हणून शतकानुशतके लोकांनी या भितीमुळे या विषमतेला पवित्र मानून आपल्याव धर्मातून हद्दपार होण्याची वेळ येऊ नये म्हणून आजवर मनुस्मृतीचे आदेश पाळण्यात आले.
“श्रीतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रं तु वै स्मृति:
ते सर्वार्थेष्वमीमांस्ये ताभ्यां धर्मो हि निर्बंभौ” (2:10)
“योऽवमन्येत ते मूले हेतुशास्त्राश्रयाद्द्विज:
स साधुर्भिर्बहिष्कार्यो नास्तिको वेदनिन्क:” (2:11)
वेद आणि धर्मशास्त्र म्हणजे श्रुति आणि स्मृति यांच्यापासून धर्माचा उदय झाला असल्याने श्रुति वा स्मृति यांच्याविरूध्द मत मांडू नये आणि या दोन शास्त्रांचे मूल्य जो मानणार नाही त्या वेदनिंदक नास्तिकाला धर्मबहिष्कृत करावे असा त्याचा अर्थ आहे.
मनुस्मृतीमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य यांचा दोनदा जन्म होतो. हे तिन्ही वर्ण द्विज आहेत. यांचा एक जन्म आईच्या पोटी होतो आणि दुसरा जन्म मुंज होते तेव्हा होतो.पण शूद्राचा जन्म मात्र एकदाच होतो कारण त्याची मुंज होत नाही.
ब्राम्हणाचे नाव मांगल्यपूर्ण असावे. क्षत्रियाचे बलवाचक असावे, वैश्याचे धनयुक्त व शूद्राचे नाव निंद्य-किळसवाणी असावे. ब्राम्हणाचे जानवे कापसाचे, क्षत्रियाचे तागाचे व वैश्याचे बकऱ्याच्या लोकरीचे आणि तिहेरी असावे व त्याला उजवीकडून पीळ असावा. ब्राम्हणाने भिक्षा मागताना ‘भवती भिक्षा दही’ म्हणावे. क्षत्रियाने ‘भिक्षां भवती देहो’ म्हणावे आणि वैश्याने ‘भिक्षां देही भवती’ म्हणावे हे मनुस्मृती सांगते. एवढेच नाही तर वरील तिन्ही लोकांच्या विवाहाचे वेगवेगळे प्रकारही मनुस्मृतीने विशद केले आहेत. वैश्य किंवा शूद्र ब्राम्हणाचया घरी अतिथी म्हणून आले तर त्यांना घरचया नोकरांसोबत जेवू घालावे. ब्राम्हणाच्या घरी क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मित्र, आप्त किंवा गुरू हे अतिथिसमान मानले जाऊ नयेत.
एकंदरीत मनुस्मृतीच्या दृष्टीने ब्राम्हण वजा जाता इतर सर्वांनाच अत्यंत नीच, नगण्य आणि तुच्छ म्हणून गणले गेले आहे. इतर सर्वांनीच ब्राम्हणाचा नेहमी सन्मान केला पाहिजे. त्याचे श्रेष्ठत्व जपले पाहिजे असे सांगणारी मनुस्मृती इतर वर्णांबद्दल मात्र अवमानकारक व सामाजिकदृष्ट्या या सर्वांनाच ती अप्रतिष्ठित करते.
महाराष्ट्रामध्ये दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने मनुस्मृती या ग्रंथावर बंदी घातली होती. त्यानुसार या ग्रंथाचे प्रकाशन व विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला होता. पण गेल्या दोन वर्षांपूर्वीपासूनबुकस्टॊलवर गुप्तपणे मनुस्मृतीच्या मराठी आवृत्यांची विक्री सुरु करण्यात आली. पुन्हा एकदा 'मनुस्मृती'ने डोकं वर काढलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला आणि सर्व बुक स्टॉलवाल्याना सज्जड बंदीचा इशाराच दिला. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/manusmriti-reprinted-in-marathi-now/articleshow/51322786.cms
तसेच दैनिक लोकमतनेही याबाबत बातमी दिलेली आहे. http://www.lokmat.com/maharashtra/manusmriti-again-publishing-new-form-despite-being-banned/
दैनिक लोकसत्तामध्ये दि. २६/११/२०१५ च्या अंकात झियाऊद्दीन सय्यद यांनी लिहिलेल्या मनुस्मृतीपासून संविधानाकडे! https://www.loksatta.com/vishesh-news/manusmriti-granth-toward-to-the-constitution-1163694/ हा लेखही विचार करायला भाग पडतो.
मनुस्मृतीने आज अस्तित्वात असलेल्या शूद्रांच्या म्हणजे ओबीसींच्या ३४६ जाती, अनुसूचित जातीच्या ५९, अनुसूचित जमातीच्या ४७, अनुसूचित जातीच्या ५९, भटक्या जमाती अ ब क ड यांच्या ५१, आणि त्यांच्या स्त्रियांच्या अनेक पिढया हजारो वर्षे जाळल्या. कोटयवधीं मानवांच्या माणुसकीची होळी करणाऱ्या विषमतेची विषारी मनुस्मृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी होळी करून समस्त बहुजनांवर अमाप उपकारच करून ठेवलेत. माझ्यामते त्यातून आपण कधीच ऋणमुक्त होऊ शकत नाही आणि बाबासाहेबांच्या ऋणातच रहावसं वाटत असेल तर प्रत्येकानेच मनुस्मृतीला मनातून कायमची जाळून टाकायला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा