बुधवार, १ मे, २०२४

वाद थांबवा, विहार वाचवा - एक चळवळ

 

"¾ÖÖ¤ü £ÖÖÓ²Ö¾ÖÖ, ×¾ÖÆüÖ¸ü ¾ÖÖ“Ö¾ÖÖ..."

        •ÖµÖ³Öß´Ö ²ÖÓ¬ÖãÓ®ÖÖê, ÛãúÞÖÖ ‹ÛúÖ“ÖÓ Æêü ÛúÖ´Ö ®Ö¾Æêü, ™üß´Ö¾ÖÛÔú ´ÆüÞÖÖ Æü¾ÖÓ ŸÖ¸... †Ö¯Ö»Öê ¯ÖÏŸµÖêÛúÖ“Öê ¾Ö›üᯙ µÖÖ “ÖÖ±êú¸üß ²Ö㬤ü ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ¸üÖ²Ö¸üÖ²Ö ¸üÖ²Ö»ÖêŸÖ... פü¾ÖÃÖ-פü¾ÖÃÖ³Ö¸ü ´ÖÖê»Ö´Ö•Öæ¸üß Ûúºþ®Ö ¸üÖ¡Öß-¸üÖ¡Öß †ÓÝÖ´ÖêÆü®ÖŸÖß®Öê †Ö¯Ö»µÖÖ»ÖÖ Ã¾Ö¯®Ö¾ÖŸÖ ¾ÖÖ™üÞÖÖ¸êü ×¾ÖÆüÖ¸ ŸµÖÖÓ®Öß ×®ÖÙ´Ö»Öêü... ŸµÖÖÓ“µÖÖ Ûú™üÖ“Öß, ŸµÖÖÝÖÖ“Öß †Ö×ÞÖ ŸµÖÖÓ“µÖÖŸÖ»µÖÖ ŸÖ£ÖÖÝÖŸÖÖÓ“µÖÖ ¯ÖÏê´ÖÖ“Öß •ÖÖÞÖß¾Ö †ÖÆêü... Ûú¤ü¸ü †ÖÆêü... †Ö¤ü¸ü †ÖÆêü... ÛúÖ¸üÞÖ µÖÖ †Ö¯Ö»µÖÖ ¾Ö›ü߻֬ÖÖ·µÖÖÓ®Öß •Ö¸ü ÛúÖ ×¾ÖÆüÖ¸ü ×®ÖÙ´ÖŸÖß“ÖÖ ×¾Ö“ÖÖ¸ü †Ó´Ö»ÖÖŸÖ“Ö †ÖÞÖ»ÖÖ ®ÖÃÖŸÖÖ ŸÖ¸ü Ûú¤üÖ×“ÖŸÖ †•Öæ®ÖÆüß “ÖÖ±êú¸üß¾ÖÖ›üß Æüß ²Ö㬤ü×¾ÖÆüÖ¸üÖ×¾Ö®ÖÖ ¸üÖÆüß»Öß †ÃÖŸÖß... ŸµÖÖÓ“Öê †Ö¯ÖÞÖÖÃÖ¾ÖÔ ŸÖ¹ýÞÖÖÓ¾Ö¸ü £ÖÖê¸ü ˆ¯ÖÛúÖ¸ü“Ö †ÖÆêüŸÖ...

        †Ö•Ö ‡ŸÖŒµÖÖ ¾ÖÂÖÖÕŸÖ ÛúÖêÞÖŸµÖÖ ÛúÖ ÛúÖ¸üÞÖÖ®Öê †ÃÖê®ÖÖ; ×¾ÖÆüÖ¸üÖÛú›êü ¤ãü»ÖÔõÖ —ÖÖ»ÖÓµÖ ÜÖ¸Óü... ¯ÖÞÖ †ÖŸÖÖ Æêü ŸÖ™üãֳÖÖ¾Ö šüÖ‡Ô šêü¾Öæ®Ö ®ÖÖÆüß “ÖÖ»ÖÞÖÖ¸ü... ×¾ÖÆüÖ¸üÖ“Öß †ÖÞÖÜÖß ÆüÖêÞÖÖ¸üß ¤îü®ÖÖ¾ÖãÖÖ ŸÖã´ÆüÖ-†Ö´ÆüÖ»ÖÖ ®ÖÖÆüß ²Ö‘Ö¾ÖÞÖÖ¸ü... †ÖŸÖÖ ¤üÖê®Æüß ¿ÖÖÜÖÖÓ“Öß Ûú¾Ö“ÖÛãÓú›ü»Öê ²ÖÖ•Öæ»ÖÖ ÃÖÖºþµÖÖ... †Ö¯ÖÞÖ“Ö †Ö¯Ö»Öê ×¾ÖÆüÖ¸ü ŸÖã´Ö“µÖÖ †Ö´Ö“µÖÖ Ûú»¯ÖÛúŸÖê®Öê ÃÖãÓ¤ü¸ü ÃÖ•Ö¾ÖãµÖÖ... ¾ÖÖ›üߟÖᯙ ¯ÖÏŸµÖêÛúÖ®Öê µÖÖ '†Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ‹Ûú ÆüÖê‰úµÖÖ...' '†Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ‹Ûú ÆüÖê‰úµÖÖ...'

        ÛúÖê™üÖÔŸÖ»µÖÖ ¾Ö×Ûú»ÖÖÓÛú¸ü¾Öê ×¾ÖÛúŸÖ ‘ÖêŸÖ»Ö껵ÖÖ †ŒÛú»Öê¯ÖêõÖÖ '“ÖãÛú³Öæ»Ö ªÖ¾Öß-‘µÖÖ¾Öß' Ûú¸üŸÖ †Ö¯ÖÞÖ“Ö †Ö¯Ö»Öê ´Ö®ÖÖê×´Ö»Ö®Ö ‘Ö›ü¾Öæ®Ö †ÖÞÖæµÖÖ. ×®Ö±úôû ³ÖÖÓ›üÞÖÖŸÖ †Ö¯Ö»µÖÖ µÖÖü ×¾ÖÆüÖ¸üÖ“ÖÖ ÜÖêôûÜÖÓ›üÖê²ÖÖ ®ÖÛúÖê ¾ÆüÖµÖ»ÖÖü. ÛúÖê™üÖÔ“ÖÖ ×¤ü»ÖÖ •ÖÖÞÖÖ¸üÖ ×®ÖÞÖÔµÖ ÆüÖ ÃÖ¾ÖÖÕ“µÖÖ“Ö ×ÆüŸÖÖ“ÖÖ ®ÖÃÖê»Ö ŸÖ¸ü ¤ãüÜÖÖ¾Ö»Öê»Öß ´Ö®Öê (´ÖÝÖ ŸÖß ÛúÖêÞÖŸµÖÖÆüß ¿ÖÖÜÖê“Öß †ÃÖÖêŸÖ) †Ö¯Ö»µÖÖ ®µÖÖµµÖÆüŒÛúÖÓÃÖÖšüß ÛúšüÖê¸ü ¯ÖÖ¾Ö»Öê ˆ“Ö»Ö»Öß •ÖÖÞµÖÖ“Öß ¤üÖ™ü ¿ÖŒµÖŸÖÖ ¾ÖÖ™üŸÖê. •Ö¸ü †ÖŸÖÖ“Ö µÖÖêÝµÖ ×®ÖÞÖÔµÖ ®ÖÖÆüß ‘ÖêŸÖ»ÖÖ ŸÖ¸ü †Ö¯ÖÞÖ Ûêú»Ö껵ÖÖ “ÖãÛúÖÓ“Öß —Öôû ¯Öãœêü †®ÖêÛú ¾ÖÂÖì †Ö¯Ö»µÖÖ»ÖÖ“Ö ²ÖÃÖŸÖ ¸üÖÆüᯙ †Ö×ÞÖ ´ÖÖÝÖ“Öß »ÖÆüÖ®Ö ×¯Öœüß ¤êüÜÖᯙ †Ö¯Ö»µÖÖ ¾ÖŸÖÔ®ÖÖÛú›êü ¯ÖÖÆüŸÖ †ÖÆêü“Ö; ×®ÖÞÖÔµÖ “ÖãÛú»ÖÖ ŸÖ¸ü Æüß ×¯Öœüß †Ö¯Ö»µÖÖ»ÖÖ ´ÖÖ±ú Ûú¸üÞÖÖ¸ü ®ÖÖÆüß µÖÖ“ÖÓ ¤êüÜÖᯙ ³ÖÖ®Ö †ÃÖæ ªÖ. ²ÖÖ•Öæ“µÖÖ ÝÖÖ¾ÖÖŸÖß»Ö ×¾ÖÛúÖê¯ÖÖ»ÖÖ ÝÖê»Ö껵ÖÖ ‘Ö™ü®ÖÖÓ“Öß ¯Öã®Ö¸üÖ¾Öé¢Öß †Ö¯Ö»µÖÖ ¾ÖÖ›üßŸÖ ´Öãôûß“Ö ÆüÖêüŸÖÖ ÛúÖ´ÖÖ ®ÖµÖê.           ´ÖÖ—µÖÖÃÖÖ¸üܵÖÖ †ÖÞÖÜÖß ÛúÖÆüß ´Öã»ÖÖÓ“ÖÓ ¤êüÜÖᯙ †ÃÖÓ“Ö ´ÖŸÖ †ÃÖæ ¿ÖÛúŸÖÓ. ®ÖãÃÖŸµÖÖ "¿ÖÖÜÖÖ-¿ÖÖÜÖÖ" Ûú¸üßŸÖ ²ÖÃÖ»ÖÖê ŸÖ¸ü ×¾ÖÆüÖ¸üÖ“µÖÖ ˆ¾ÖÔ׸üŸÖ ÝÖÖ³ÖÖ·µÖÖ“Öß ÃÖ㬤üÖ Ø“ÖŸÖÖ ¾ÖÖ™üŸÖê. ¤üÖê®Æüß ¿ÖÖÜÖÖ ²ÖÖ•Öæ»ÖÖ šêü¾Öæ®Ö ±úŒŸÖ †Ö×ÞÖ ±úŒŸÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß “ÖÖ±êú¸üß ²ÖÖü¾ÖÖ›üß ‹Ûú ÆüÖê¾ÖãµÖÖ. ×¾ÖÆüÖ¸üÖ“Öê ÛúÖ´Ö ¯ÖæÞÖÔ Ûú¹ýµÖÖ †Ö×ÞÖ ´ÖÝÖ ¾ÖÖ™ü»ÖÓ ŸÖ¸ü ¿ÖÖÜÖÖÓ“ÖÖ ×¾Ö“ÖÖ¸ü Ûú¹ýµÖÖ. †Ö¯ÖÞÖ ³ÖÖÓ›üŸÖ ŸÖ¸ü ®ÖÓŸÖ¸ü ¤êüÜÖᯙ ¸üÖÆæü... ¯ÖÞÖ †Ö¬Öß ×¾ÖÆüÖ¸ü ÆüÖê¾Öæ ªÖ.

          '¾Öî¸ü¾ÖÖß ×´Ö™üÞÖÖ¸ü ®ÖÖÆüß ²ÖÖüŸÖŸ¾Ö Æêü •ÖÖÞÖ...' †Öšü¾ÖÖ Æêü †Ö¯Ö»µÖÖ“Ö ‘ÖÖ¹ý²Öã¾ÖÖÓ®Öß ×»Öׯü»Öê»ÖÓ †£ÖÔ¯ÖÞÖæÔ ÝÖßŸÖ •Öê †Ö¯Ö»µÖÖ“Ö •Ö»Ö¿ÖÖ´Ö¬µÖê, †Ö¯Ö»µÖÖ“Ö ¸üÖ´Ö•Öß ÛúÖÓ²ÖôëûÃÖÆü ÃÖ¾ÖÖÕ®Öß“Ö •ÖÖê¿ÖÖŸÖ ÝÖÖµÖü»Öê»ÖÓ... ÜÖ¸Óü“Ö †Öšü¾ÖÖ...†Ö×ÞÖ Ûú¸üÖ ×¾Ö“ÖÖ¸ü ÃÖ¤ËüÃÖ¤Ëü ×¾Ö¾ÖêÛúÖ»ÖÖ •ÖÖÝÖéŸÖ šêü¾Öæ®Ö ¯Öã®ÆüÖ ‹Ûú¤üÖ †Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß...!

        '¾ÖÖ¤ü £ÖÖÓ²Ö¾ÖÖ, ×¾ÖÆüÖ¸ü ¾ÖÖ“Ö¾ÖÖ' µÖÖ “Öôû¾Öôûß«üÖ¸êü †Ö•Ö ÃÖ¾ÖÖÕ®ÖÖ ´Öß †Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ÃÖÖ¤ü ‘ÖÖ»ÖßŸÖ †ÖÆêü... £ÖÖÓ²Ö¾ÖÖ ŸÖê ×¾ÖŸÖã™ü... ™üÖÛæú®Ö ªÖ ŸÖß ¯Öã¾ÖÔ¤æü×ÂÖŸÖ ³ÖÖ¾Ö®ÖÖ... ˆ®´Öôæû®Ö ™üÖÛúÖ ŸµÖÖ †™üß-¿ÖŸÖ⓵ÖÖ Ø³ÖŸÖß... ¤üÖê®Æüß ¿ÖÖÜÖÖÓ“µÖÖÆüß ¯Ö×»ÖÛú›êü •ÖÖ‰ú®Ö... ±úŒŸÖ †Ö×ÞÖ ±úŒŸÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÜÖÖ»Öß ‹Ûú ¾ÆüÖ... •ÖßÞÖÔ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ‹Ûú ¾ÆüÖ...

        ´Öß ‹Ûú ¾ÖÖ›üߟֻÖÖ“Ö ÃÖÖ´ÖÖ®µÖ ´Öã»ÖÝÖÖ - †Ö¯Ö»ÖÖ ²ÖÓ¬Öæ †Ö×ÞÖ ×¾Ö¯Ö¿µÖ®ÖÖ ÃÖÖ¬ÖÛú ´ÆüÞÖæ®Ö Æêü †Ö¯ÖÞÖÖÃÖ †Ö¾ÖÖÆü®Ö Ûú¸üßŸÖ †ÖÆêü; ´ÖÖ—ÖÓ Ã¾ÖŸÖ:“ÖÓ ¾ÖîµÖ׌ŸÖÛú ´ÖŸÖ †Ö¯Ö»µÖÖÃÖ´ÖÖê¸ü ´ÖÖÓ›ü»ÖÓ †ÖÆêü. ÛúÖêÞÖŸµÖÖÆüß ¿ÖÖÜÖê“ÖÖ µÖÖ´Ö¬µÖê †ÓŸÖ³ÖÖÔ¾Ö ®ÖÖÆüß Æêü Ûéú¯ÖµÖÖ »ÖõÖÖŸÖ ‘µÖÖ. †Ö¯Ö»µÖÖ ‹Ûú´ÖêÛúÖÓ“µÖÖ ¯ÖÏןÖÃÖÖ¤üÖ®Öê †Ö×ÞÖ ÃÖÆüÛúÖµÖÖÔ®Öê ™üß´Ö¾ÖÛÔú Ûúºþ®Ö ÜÖ¸üß †Ö¤ü¿ÖÔ¾ÖŸÖ †¿Öß ÛÎúÖÓŸÖß ‘Ö›ü¾ÖæµÖÖ... †Ö•Öæ²ÖÖ•Öæ“µÖÖ ÝÖÖ¾ÖÖÓ®ÖÖÆüß †Ö¯Ö»ÖÖ †Ö¤ü¿ÖÔ ¤üÖÜÖ¾Öæ®Ö ¤êü¾ÖæµÖÖ... †Ö¯Ö»µÖÖ ÃÖÆüÛúÖµÖÖÔ“µÖÖ ¯ÖÏןÖõÖêŸÖ..!

                                                                                                    -  ו֟Öë¦ü ¯Ö¾ÖÖ¸ü

ÃÖÓ¯ÖÛÔú - 9765039979



गुरुवार, ११ मे, २०२३

निर्मला देवींच्या जाहीरातीवरील समिक्षा

 निर्मला देवींच्या जाहीरातीवरील समिक्षा

(नातेवाईकांनी व्हाट्सअप वर पाठवलेल्या हॅन्डविला त्यांना दिलेले उत्तर)



     सहजयोग गुरु परमपूज्य माताजी निर्मला देवी यांच्या अध्यात्माबद्दल आदर आहेच. त्यांच्या आयुष्यात शांततेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे भान ठेवून तुम्ही पाठवलेल्या पॅम्प्लेटमध्ये काही त्रुटी, उणीवा आढळून आल्या त्याबद्दलचे काही मुद्दे मांडू इच्छितो. 

बौद्ध धम्माच ब्रीद असलेल्या 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' यातील 'सुखाया' असं चुकीचं लिहीलं गेल्याचं दिसून येते. 

दुसरं म्हणजे बाबासाहेबांचं लिहिलेलं चुकीचं नाव- बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर असे नसून एकतर डॉ. बी. आर. आंबेडकर तरी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी लिहावयास हवे होते. 

पॅम्प्लेट मधील लिखाण हे गुगलवरच्या विकिपीडिया मधून मिळवल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे ते वृक्ष वाटते. 

बाबासाहेबांना कधीही विभूती मान्य नसून ते आधुनिक विचारसरणीचे असल्यामुळे पुराणातील व्यास, वाल्मिकी, राम इत्यादींचे अस्तीत्व नाकारले. त्यांनी हिंदू देवतांची उपासना करणार नाही अशी 22 प्रतिज्ञांमध्ये 1956 च्या बौध्द धम्माच्या दीक्षा समारंभात शपथ घेतली व आपल्या साऱ्या अनुयायांनाही दिली. त्याचबरोबर सर्व बहुजन समाज वंचित पीडित असलेल्या स्त्रिया (यामध्ये ‍ख्रीश्चन-अल्पसंख्यांक असलेल्या निर्मला मातेचाही समावेश आहे) यांना सन्मान देऊन संविधान रूपाने जणू त्यांना ढालच सुपूर्द केली. मात्र आजच्या उच्च पदावर गेलेल्या स्त्रिया यांना बाबासाहेबांच्या बहुमोल कार्याची जाणीव नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. 

पॅम्प्लेट वरील मातेचा स्वतःचा सुरूवातीला भव्य दिव्य फोटो, स्वत:ची जाहीरात आणि त्याखाली महामानव महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचे छोटे फोटो आणी त्यांच्याबद्दलची २/४ वाक्यांची जुजबी माहीती यामधला भेद हा अनपेक्षीत आहे. 

पॅम्प्लेटमध्ये माताजींचे वडील पि के राव साळवे हे अत्यंत "उच्च दर्जाचे" स्वातंत्र्यसैनिक होते असे म्हटले आहे. खरे तर स्वातंत्र्यसैनिक यांना "उचनीचतेचा दर्जा" देऊन आपण त्यांच्या हौताम्याचं, त्यांच्या योगदानाचं अवमूल्यन केल्यासारखे आहे. स्वातंत्र्यसैनिक हा शेवटच्या रांगेतला असो वा प्रथम क्रमांकाचा; प्रत्येकाच्या नसानसात देश प्रेम, त्याग ठासून भरलेला असतो. त्यामुळे स्वातंत्र्यसैनीकाला कोणताही दर्जा देणे हे सगळ्यात घातक आहे.

बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे. ज्याला धर्म आणि धम्म या मधला फरक कळत नाही तो अशी गफलत करू शकतो हे मी सांगावयाची गरज नाही. 

माताजींचे पिताश्री पी के राव साळवे समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक असतीलही. कायद्याचे शिक्षण ही घेतले असेल, 14 भाषा ही त्यांना अवगत असतीलही. माताजींच्या बायोग्राफीत म्हटल्याप्रमाणे "Her father, a talented lawyer and close associate of Mahatma Gandhi, was a member of the Constituent Assembly of India and helped write India's first constitution." मात्र पॅम्लेटमधील विधानानुसार संविधान सभेच्या सदस्यांच्या यादीत पी के राव साळवे असे नाव कुठेही नमूद नाही ‍ कींबहुना बाबासाहेबांना संवीधान लिहावयास मदत केली. ही सर्व विधाने अतिशय हास्यास्पद आहेत. आपल्या माहीतीसाठी संविधान सभेच्या सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे देत आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधान समितीच्या एकूण २८४ सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत.

ओ.वी.मुदलियार अलगेसन, अम्मु स्वामीनाथन, एम ए अयंगार, मोटूरि सत्यनारायण, दक्षयनी वेलायुधन, दुर्गाबाई देशमुख, एन. गोपालस्वामी अयंगर, डी. गोविंदा दास, जेरोम डिसूजा, पी. कक्कन, टी एम कलियन्नन गाउंडर, लालकृष्ण कामराज, वी. सी. केशव राव, टी. टी. कृष्णमाचारी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एल कृष्णास्वामी भारती, पी. कुन्हिरामन, मोसलिकान्ति तिरुमाला राव, वी. मैं मुनिस्वामी पिल्लै, राजा एम अन्नामलाई मुत्तैया चेट्टियार, वी. नादिमुत्तु पिल्लै, एस नागप्पा, पी. एल नरसिम्हा राजू, पट्टाभि सीतारमैया, सी. पेरुमलस्वामी रेड्डी, टंगुटूरी प्रकाशम, एस एच. गप्पी, श्वेताचलपति रामकृष्ण रंगा रोवा, आर लालकृष्ण शन्मुखम चेट्टि, टी. ए रामलिंगम चेट्टियार, रामनाथ गोयनका, ओ पी. रामास्वामी रेड्डियार, एन जी रंगा, नीलम संजीव रेड्डी, शेख गालिब साहिब, लालकृष्ण संथानम, बी शिव राव, कल्लूर सुब्बा राव, यू श्रीनिवास मल्लय्या, पी. सुब्बारायन, चिदम्बरम् सुब्रह्मण्यम्, वी सुब्रमण्यम, एम. सी. वीरवाहु, पी. एम. वेलायुधपाणि, ए क मेनन, टी. जे एम विल्सन, मोहम्मद इस्माइल साहिब, के. टी. एम. अहमद इब्राहिम, महबूब अली बेग साहिब बहादुर, बी पोकर साहिब बहादुर, वी. रमैया, रामकृष्ण रंगा राव, बालचंद्र महेश्वर गुप्ते, हंसा मेहता, हरिविनायक पटस्कर, बाबा साहब डॉ.भीमराव अम्बेडकर, यूसुफ एल्बन डिसूजा, कन्हैयालाल नानाभाई देसाई, केशवराव जेधे, खंडूभाई कसनजी देसाई, बाळासाहेब गंगाधर खेर, मीनू मसानी, कन्हैयालाल माणिकलाल मुंशी, नरहर विष्णु गाडगील, एस निजलिंगप्पा, एस. के. पाटिल, रामचंद्र मनोहर नलावडे़, आर आर दिवाकर, शंकरराव देव, गणेश वासुदेव मावलंकर, विनायकराव बालशंकर वैद्य, बी एन मुनवली, गोकुलभाई भट्ट, जीवराज नारायण मेहता, गोपालदास अंबैदास देसाई, प्राणलाल ठाकुरलाल मुंशी, बी एच. खरडेकर, रत्नाप्पा कुंभार, वल्लभ भाई पटेल, अब्दुल कादर मोहम्मद शेख, आफताब अहमद खान विनायक राणे , पंजाबराव देशमुख, सं.दि.परब, मनमोहन दास, अरुण चन्द्र गुहा, लक्ष्मी कांता मैत्रा, मिहिर लाल चट्टोपाध्याय, काफ़ी चन्द्र सामंत, सुरेश चंद्र मजूमदार, उपेंद्रनाथ बर्मन, प्रभुदयाल हिमतसिंगका, बसंत कुमार दास, रेणुका राय, हरेन्द्र कुमार मुखर्जी, सुरेंद्र मोहन घोष, श्यामाप्रसाद मुखर्जी, अरी बहादुर गुरुंग, आर ई. पटेल, क्षितिज चंद्र नियोगी, रघीब अहसान, सोमनाथ लाहिड़ी, जासिमुद्दीन अहमद, नज़ीरुद्दीन अहमद, अब्दुल हलीम गज़नवी, डॉ भीमराव अम्बेडकर, अजीत प्रसाद जैन, अलगू राय शास्त्री, बालकृष्ण शर्मा, बंशीधर मिश्र, भगवान दीन, दामोदर स्वरूप सेठ, दयाल दास भगत, धरम प्रकाश, ए धरम दास, रघुनाथ विनायक धुलेकर, फिरोज गांधी, गोपाल नारायण, कृष्ण चंद्र शर्मा, गोविंद बल्लभ पंत, गोविंद मालवीय, हरियाणा गोविंद पंत, हरिहर नाथ शास्त्री, हृदय नाथ कुन्ज़रू, जसपत राय कपूर, जगन्नाथ बख्श सिंह, जवाहरलाल नेहरू, विजय लक्ष्मी पंडित, जोगेन्द्र सिंह, जुगल किशोर, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, बी वी. केसकर, कमला चौधरी, कमलापति त्रिपाठी , आचार्य कृपलानी, महावीर त्यागी, खुरशेद लाल, मसुरियादीन, मोहनलाल सक्सेना, पदमपत सिंघानिया, फूल सिंह, परागी लाल, पूर्णिमा बनर्जी, पुरुषोत्तम दास टंडन, हीरा वल्लभ त्रिपाठी, राम चंद्र गुप्ता, शिब्बन लाल सक्सेना, सतीश चंद्रा, जॉन मथाई, सुचेता कृपलानी, सुंदर लाल, वेंकटेश नारायण तिवारी, मोहनलाल गौतम, विश्वम्भर दयालु त्रिपाठी, विष्णु शरण दुबलिश, बेगम ऐज़ाज़ रसूल, चौधरी हैदर हुसैन, हसरत मोहानी, अबुल कलाम आजाद, नवाब मुहम्मद इस्माईल खान, रफी अहमद किदवई, मौलाना हिफ्ज़ुर्हमान स्योहारवी, बशीर हुसैन जैदी, रणबीर सिंह हुड्डा, बख्शी टेक चन्द, पंडित श्रीराम शर्मा, जयरामदास दौलताराम, ठाकुरदास भार्गव, बिक्रमलाल सोंधी, यशवंत राय, लाला अचिंत राम, नंद लाल, सरदार बलदेव सिंह, गुरमुख सिंह मुसाफिर, सरदार हुकम सिंह, सरदार भूपिंदर सिंह मान, सरदार रतन सिंह लौहगढ़, सरदार रणजीत सिंह, अमिय कुमार घोष, अनुग्रह नारायण सिन्हा, बनारसी प्रसाद झुनझुनवाला, भागवत प्रसाद, Boniface लाकड़ा, ब्रजेश्वर प्रसाद, चंडिका राम, लालकृष्ण टी. शाह, देवेंद्र नाथ सामंत, डुबकी नारायण सिन्हा, गुप्तनाथ सिंह, यदुबंश सहाय, जगत नारायण लाल, जगजीवन राम, जयपाल सिंह मुंडा, कामेश्वर सिंह, कमलेश्वरी प्रसाद यादव, महेश प्रसाद सिन्हा, कृष्ण वल्लभ सहाय, रघुनंदन प्रसाद, राजेन्द्र प्रसाद, रामेश्वर प्रसाद सिन्हा, राम नारायण सिंह, सच्चिदानन्द सिन्हा, सारंगधर सिन्हा, सत्येन्द्र नारायण सिन्हा, बिनोदानंद झा, पी. लालकृष्ण सेन, श्रीकृष्ण सिंह, श्री नारायण महता, श्यामनन्दन सहाय, हुसैन इमाम, सैयद जाफर इमाम, एस.एम.लतीफुर्रहमान, एम. ताहिर, तजमुल हुसैन, चौधरी आबिद हुसैन, हरगोविन्द मिश्र, गुरु अगमदास, रघु वीर, बड़ेभाई ठाकुर ललोनी, राजकुमारी अमृत कौर, नगला भौगरा (कामा) , भगवंतराव मंडलोई, बृजलाल बियाणी, बैरिस्टर ठाकुर छेदीलाल, प. किशोरी मोहन त्रिपाठी, सेठ गोविंद दास, डाँ.सर हरिसिंह गौर, हरि विष्णु कामथ, हेमचन्द्र जगोबाजी खांडेकर, घनश्याम सिंह गुप्ता, लक्ष्मण श्रवण भाटकर, पंजाबराव शामराव देशमुख, रविशंकर शुक्ल, आर लालकृष्ण सिधवा, शंकर त्र्यंबक धर्माधिकारी, फ्रैंक एंथोनी, काजी सैयद करीमुद्दीन, गणपतराव दानी, आर.एल. मालवीय, रामप्रसाद पोटाई, निबारन चंद्र लास्कर, जेम्स जॉय मोहन निकोल्स रॉय, धरणीधर बसु मतरी, गोपीनाथ बोरदोलोई, कुलाधौर चालिहा, रोहिणी कुमार चौधरी, मुहम्मद सादुल्ला, अब्दुल रऊफ, विश्वनाथ दास, कृष्ण चन्द्र गजपति नारायण देव, हरेकृष्ण महताब, लक्ष्मीनारायण साहू, लोकनाथ मिश्र, नंदकिशोर दास, राजकृष्ण बोस, शांतनु कुमार दास, लाल मोहन पति, एन माधव राव, राज कुंवर, शारंगधर दास, युधिष्ठिर मिश्र, देशबंधु गुप्ता, मुकुट बिहारी लाल भार्गव, सी. एम. पूनाचा, के.सी.रेड्डी, के.हनुमन्तैया, टी. सिद्धलिंगैया, आर गुरुव रेड्डी, एस वी कृष्णमूर्ति राव, एच. सिद्धवीरप्पा, टी. चेन्निया, शेख मुहम्मद अब्दुल्ला, मोतीराम बैगरा, मिर्जा मोहम्मद अफजल बेग, मौलाना मुहम्मद सईद मसूदी, पट्टम ताणु पिल्लै, आर शंकर, पी. टी. चाको, पानमपिली गोविन्द मेनन, एनी मस्करीन, पी. एस. नटराज पिल्लई, के ए मोहम्मद, विनायक सीताराम सरवटे, बृजराज नारायण, गोपीकृष्ण विजयवर्गीय, राम सहाय, कुसुम कांत जैन, राधवल्लभ विजयवर्गीय, सीताराम एस जापू, बलवंतराय मेहता, जयसुख लाल हाथी, ठक्कर बापा, चिमनलाल चकूभाई शाह, सामलदास गांधी, जयपुर से वी. टी. कृष्णमाचारी और हीरालाल शास्त्री, खेतड़ी से सरदार सिंह, बीकानेर से के एम पण्णिकर‌ और जसवंत सिंह, भरतपुर से राज बहादुर, उदयपुर से माणिक्य लाल वर्मा और बलवंत सिंह मेहता, शाहपुरा से गोकुल लाल असावा, अलवर से रामचंद्र उपाध्याय, कोटा से दलेल सिंह, जोधपुर से जय नारायण व्यास और सी एस वेंकटाचारी सर टी वी राघवाचर्या(उदयपुर), अवधेश प्रताप सिंह, शम्भूनाथ शुक्ल, राम सहाय तिवारी, मन्नूलालजी द्विवेदी, भैयालाल सिंह, हिम्मत सिंह लालकृष्ण माहेश्वरी, गिरिजा शंकर गुहा, रवि मैहरा, लाल सिंह, भवनजी अर्जुन खिमजी, यशवंत सिंह परमार.

पॅम्प्लेटमध्ये माताजींचे वडील गांधीवादी होते असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे बाबासाहेबांशी मैत्री असणे ही गोष्टच अनाकलनीय आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांचे माताजींच्या घरी येणे-जाणे (?) किंवा माताजींना लाभलेला बाबासाहेबांचा सहवास(?) या गोष्टी म्हणजे फेकाफेकीचा कळसच झाला. कारण बाबासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये माताजी किंवा त्यांचे वडील पि के राव साळवे यांचा कुठेही उल्लेख नाही. भले, गांधींनी माताजींना नेपाळी म्हणायचे ते म्हणो. माताजींचे वडील गांधीवादी होते. त्यामुळे गांधींचा सहवास लाभणे यात काही शंकाच नाही. किंवा असाही तर्क निघतो की, गांधींची हत्या 30 जानेवारी 1948 झाली त्याच्या आदल्या दिवशी गांधी माताजींना लाडाने नेपाळी म्हणाले. मग गांधींच्या हत्येनंतर माताजी व त्यांचे वडील हे गांधीवादी न रहाता आंबेडकरवादी झाले की काय?

एखाद्या महापुरुषाचं नाव अख्ख्या जगभर प्रसिद्ध झालेलं असतं. मग या समाजात काही लोकांची विकृती अशी असते की या महामानवाच्या नात्याशी आपला संबंध जोडावयाचा आणि आपली खाली असलेली प्रतिष्ठा थोडी आपणच स्वतःहून उंचवावयाची; हा एक बालिश प्रयत्न असतो.  त्याचप्रमाणे माताजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या नावाला त्यांचा सहवास लाभल्याचं भासवून आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे. 

बाबासाहेब माताजींच्या घरी जात असत असाही केविलवाणा प्रयत्न वाचून वाईट वाटतं. थोडक्यात, बाबासाहेबांच्या शालूला स्वतःचं लुगडं लावून पुढे करण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद नाहीतर आणि काय? 

बौद्ध धर्म आणि सहजयोग या मुद्द्यांमध्ये कुंडलिनी जागृत होण्याचा मुद्दा मांडला आहे. मात्र तथागतांनी म्हणजेच गौतम बुद्धांनी अशा कुंडलिनी चक्राचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यांनी ध्यानही केलं नाही. त्यांनी तपश्चार्याही केली नाही. त्यांनी तपही केले नाही. त्यांनी फक्त आणि फक्त एकाग्रतेने चिंतन केले. आपण गफलत हीच करतो. ध्यान, तपश्चर्या आणि चिंतन, मनाची एकाग्रता हे सगळं एकाच मोळीत बांधायचा प्रयत्न करतो पण तो खरा नव्हे. 

स्वतःला जागृत करा. "अत्त दीप भव" असं बुद्धाने म्हटलंय. प्रेम, करुणा, दया वाटा. जग आपोआप सुंदर होईल. या अनेक बुद्धांच्या शिकवण्या इतर लोक आपापल्या प्रवचनामध्ये कॉपी करून ते स्वतःच्या नावावर खपवतात हा अनेक वर्षांचा इतिहास आहे.

माताजींचं एक वाक्य मात्र पटलं. ज्यांच्या अंत:करणात करुणा नाही त्यांनी समाजकार्य करू नये ज्यांनी समाजकार्य केले नाही त्यांनी राजकारणात जाऊ नये.

बौद्ध धम्मात फक्त बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संगम शरणम गच्छामि याचा अर्थ सांगितला की धम्म संपत नाही. बौद्ध धम्म हा विशाल समुद्रासारखा आहे. केवळ या त्रिसूत्रींचा अर्थ सांगून धम्म समजून घेता येत नाही. 

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही इतिहास या पॅम्प्लेटमध्ये केवळ दोन-चार ओळींमध्ये मांडून त्यांच्या कार्याचा आढावा इतका शॉर्टकट कधीच पाहिलेला नसावा. हे पॅम्प्लेट काहीसं जाहिरातबाजीचं असल्याचं जाणवतं.

मी हे ही जाणतो की, हे पॅम्लेट काही खुद्द माताजींनी लिहीलेलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा महिमा गौरवीण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. पण त्यातही एकसूत्रता नाही. असो...

-  जितेंद्र पवार

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

आश्विनी..!

आश्विनी..! 


    जिचं माहेर आणि सासर हे एकाच ठिकाणी जोडून ठेवणारी... घराला घरपण देणारी... नात्याने लहान असूनही मोठमोठाल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेळणारी

.. समोर संकटं उभी ठाकलेली असूनही चेहऱ्यावर सदा नितळ हसू बाळगणारी... बोलघेवडी... निर्मळ मनाची... मायाळू... दयाळू... जिच्या वावरण्यानं-अस्तित्वानं घरातील चैतन्य जागृत करणारी... लाभलेल्या अल्पायुष्यामध्ये आम्हा प्रत्येकात प्रेमाचे, आपुलकीचे, मायेचे, ऋणानुबंधाचे सडे शिंपडीत नंदनवन फुलवणारी... स्वतःच्या त्यागाची आहुती देत जी काही जडणघडण निर्माण केली... अशी ही आमची सून... आश्विनी..! हिचा पुण्यानुमोदन-शोकसभा करण्याची वेळ आमच्यावर यावी यापेक्षा आणखी दुर्दैव ते काय?

       ज्या आक्राळ-विक्राळ आजारांना तिला गिळंकृत केलं त्या आजाराचा सामना तिने जीवनाच्या अखेरपर्यंत केला खरा; पण शेवटी शोकांतिका ठरली. आमच्या विनोदला ह्या असल्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ ही काही नवी नाही. मोठा भाऊ व आमचा मोठा भाचा दिवंगत प्रमोदलाही वाचवण्यासाठी आणि आज त्याच्या पत्नीलाही वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आमच्या विनोदला - त्याच्या अविरत प्रयत्नांना यश आलं नाही.

       आज या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने हेच सांगणे आहे की, आजपर्यंत तू अनेक संकटे झेललीस... त्यात तुला नोकरीही गमावी लागली... स्वतःकडे दुर्लक्ष करून तू अश्विनीसाठी झटलास... मात्र आता तुला या सर्वांच्या परे जाऊन तुझ्या गोंडस मुलीसाठी-विनंतीसाठी पुन्हा नव्याने आणि जोमाने आयुष्याला सुरुवात कर. तुझ्या पंखात बळ येवो आणि पुन्हा नव्याने उत्तुंग अशी भरारी घे..! 

      आज आम्हा प्रत्येकाच्या मनात जीचे कधीही विस्मरण होऊ शकत नाही अशा या आमच्या सुनेला-अश्विनीला निर्माण प्राप्त होवो!!!

       मी चंद्रकांत पवार चाफेरी माझे कुटुंबीयंतर्फे, भारतीय बौद्ध महासभा गावशाखा चाफेर आणि जनकल्याण कमिटी यांच्यावतीने आमच्या या सुनेला आदरांजली व श्रद्धांजली अर्पण करतो. नमोबुद्धाय - जय भीम 



गुरुवार, ५ मे, २०२२

होय, मला भिम पावला...

अमानुषतेचा फास सोडविण्या

पूर्वजांचा माझ्या जो धावला...

होय, मला भिम पावला... 

होय, मला भिम पावला...


हजारो वर्षे विद्येपासून वंचित असलेला मी... 

स्वाभिमान-आत्मसन्मानाचा लवलेश नसलेला मी... 

दोन पाय दोन हात आणि हा देह आजवर जनावरात जगलेला मी...

सनातन्यांची अंध:कारमय गुलामी करीत आलेला मी... 

आणि नव्या उमेदीचं, स्वाभिमानाचं जग असतं याची जाणीव नसलेला मी... 

पिचलेल्या, दबलेल्या, भेदरलेल्या अन् दिडमुग झालेल्या आवाजातला मी...

अखेर फोडला एकदाच असा टाहो की, 

आक्रोशाने जातीबाटीचा हा देश आणि सहिष्णूवाद्यांची उडविली तारांबळ

घेऊन लेखणी अन अंधार ज्वलंत शब्दांची 

केला एल्गार सत्याग्रहाचा उडविली झोप काळ्या रामाची पण खितपत पडलेल्या घोर अन्यायाची...


नागवंशीयाचा जन्म माझा 

घेऊन दीक्षा धम्माची 

शिकलो सवरलो मिळवूनि त्या शिष्यवृत्त्या 

भोजन केले सौख्याचे भटाबामणाच्या मांडीला बसून...


जमीन-अस्मानाचा हा कायापालट 

नाही एका रात्रीत जाहला... 

होय मला भीम पावला...

               

अमानुषतेचा फास सोडविण्या

पूर्वजांचा माझ्या जो धावला...

होय, मला पावला... 

होय, मला भीम पावला...

                           -  जितू

रविवार, २७ मार्च, २०२२

प्रगल्भ विचारांचा साठा-पांडुरंग मामा (P.B.Kamble)


 पांडुरंग बेंडू कांबळे हे नाव गावापासून मुंबईपर्यंत सर्वांना परिचयाचे असले तरी आम्हा भावंडांसाठी तुम्ही फक्त 'पांडुरंग मामाच..!' एरवी आपल्या मराठी संस्कृतीत आईचा भाऊ म्हणजे भाचरांचा मामा हा खरंतर मित्र असतो. त्यामुळे त्याला त्याची भाचरे 'ए मामा, रे मामा' अशी हाक मारतात. पण आम्हा भावंडांच्या तोंडून कधीच आमच्या सर्व मामांना अशी एकेरी हाक आली नाही. अर्थात ही रीत आमच्या अजाण वयातच सुरू झाली असल्याकारणाने स्वाभाविकच 'अहो मामा' अशी आदरार्थी साद घालण्यामागे माझ्या आईवडिलांची देण आहे. तिचे भाऊ आणि वडिलांचे मेहुणे यांच्याप्रति असलेला सच्चा आदर-प्रेम प्रकट होते. त्यातून आमच्या तीन मामांपैकी तुम्ही तुलनेने उच्चशिक्षित. त्याकाळी जुनी अकरावी म्हणजे मॅट्रिक. पण मॅट्रिकची सर, तो शिक्षणाचा दर्जा हा आजकालच्या पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यालाही झेपेल असं वाटत नाही. त्यामुळे मामा तुमच्याकडे आजवर मी पहात आलोय ते एक उच्चविभूषित असं व्यक्तिमत्त्व याच आदराने. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला भेटलात तेव्हा तेव्हा मामा तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक शब्दाचा, त्यातील भावार्थाचा, तुमच्या सौम्य भाषेचा, तुमच्या मृदु स्वभावाचा, तुमच्या टापटीप राहणीमानाचा, सेंट्रल गव्हर्नमेंट सर्विसच्या त्या क्रेन ऑपरेटर या कुशल तांत्रिक पदाचा, तुमच्या भाषेवरील प्रभुत्वाचा, तुमच्या सुवाच्च अक्षराचा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आमच्या गोड मामाचा दिवसेंदिवस आदर हा वाढतच गेला... तुमच्या-माझ्यामधील वयामध्ये सुमारे तीस एक वर्षांचा फरक असावा. लहानपणीच एवढं आठवत नाही... पण जसजसा पुढे वाढत गेलो मला पुस्तकांचा लळा पाहून तुम्ही माझ्याकडे जास्तीत जास्त संवाद साधून विचारांची देवाण-घेवाण करण्याचा तुमच्या विलक्षण कलेमुळे विशिष्ट दृष्टीने माझ्यातल्या 'मी'ला शोधू लागलो. एक वेगळा आयाम घडू पाहत होता... कॉटनग्रीनला तुम्ही वाचलेले नवाकाळ, लोकसत्ता, मुंबई चौफेर माझ्या हाती असलेले पाहून तुम्ही मला नवाकाळच्या खाडिलकरांना 'अग्रलेखांचा बादशहा' का म्हणतात याची अनेक लेखांचा उल्लेख करून उकल केलीत. वर्तमानपत्रातील सर्व शब्दकोड्यांचा सराईतपणे फडशा पाडणारे तुम्ही जेव्हा गावी आल्यावर आमच्याकडे येणाऱ्या दैनिक रत्नागिरी टाइम्स मधल्या प्रसन्न कांबळींची मला किचकट वाटणारी ती शब्दकोडीही तुम्ही चुटकीसरशी सोडवलेली पाहून माझे डोळे त्या काळी अक्षरशः दिपून गेले होते; याला कारण तुमचं भाषेवरील प्रभुत्व! या तुमच्या भाषेवरील प्रभुत्वाची आणखी एक झलक तुम्ही आम्हाला पाठवलेल्या पत्रातून दिसते. हो...हो... पोस्टाने पाठवलेलं पत्र... कारणही तसंच होतं. 1998 साली कोकण रेल्वेचा पहिल्याच दिवसाचा पहिला प्रवास करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं... तुम्ही सुखरूप मुंबईला पोहोचल्यावर आम्हाला त्या कोकण रेल्वे आणि कोकणच्या निसर्गरम्य अशा डोंगर-दऱ्या, नद्या-खाड्या आणि एकापाठोपाठ येणारे बोगदे आणि तो गोंगाट यांचं इतकच छान असं आलंकारिक वर्णन तुम्ही त्या पत्रात लिहून पाठवलंत... आणि काय योगायोग पहा, त्याच वर्षी हायस्कूलमध्ये आम्हाला 'कोकण रेल्वेचा अविस्मरणीय प्रवास' या विषयावर निबंध लिहिण्यासाठी प्रश्नपत्रिका माझ्या समोर आली. पण मी तर तेव्हा कोकण रेल्वेचा प्रवास केलेलाच नव्हता... माझ्या डोळ्यासमोर सरकन तुम्ही लिहिलेले पत्र उभे राहिले आणि मग काय विचारता, तुम्ही केलेले ते कोकण रेल्वेच्या प्रवासाच्या प्रतिभाशाली वर्णनाचा आधार घेत मी हा निबंध सहज संपवला... हा किस्सा मी जेव्हा तुम्हाला ऐकवला नं तेव्हा तुम्हीही मनोमन सुखावला होतात... थँक्यू मामा..! थँक्यू सो मच..!!

  सात बेटांच्या बनलेल्या देशातील नंबर एकच्या या मुंबई शहराबद्दल ब्रिटिश कालखंडापासूनच्या अनेक गोष्टी तुम्ही मला सांगितल्या. त्यातीलच 656 हेक्टर क्षेत्रफळ असलेली तुमची बॉम्बे पोर्ट ट्रस्ट अर्थात बीपीटी ही तुम्ही जातीने स्वतः मला फिरून दाखवली याच वेळी आणखी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट घडून आली ती म्हणजे भारताची प्रसिद्ध असलेली युद्धनौका 'विक्रांत' हिचे मला दर्शन घडवून आणलेत. तसेच पिंकीला सांगून बाबासाहेबांच्या सिद्धार्थ कॉलेजचे दर्शन झाले. मामा माझ्यासाठी ही खूप बहुमोल अशी गोष्ट आहे हे मी कृतज्ञतापूर्वक सांगू इच्छितो.

माझे वडील मुंबईला आल्यावर यत्किंचितही मागचा पुढचा विचार न करता कामावर सुट्टी टाकून आपल्या मेहुण्या सोबत फिरत होतात ही आठवण माझे वडील वारंवार करतात ना त्यावेळी तुमच्या दिलदार स्वभावाची जाणीव होते.

  तुम्ही तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या उच्च पदाचा कधीच गर्व केला नाहीत. सदा मृदू आणि शांत स्वभाव आणि या तुमच्या स्वभावामुळे तुम्ही सर्वांना आपलंसं केलंत... ऋणानुबंधाने साऱ्यांना गुंफून ठेवलंत... त्यामुळे आज तुमची सर्व जोडलेली माणसं आज तुमच्या नसण्याने, तुमच्या विरहाने शोकाकुळ आहेत.

माझ्या भावना, माझे दुःख अशी चार-चौघात व्यक्त करणे माझ्या बुद्धीला पटत नाही पण आज मला... तुमच्या जितुला… तुमच्या स्मृती मांडल्या वाचून राहावत नाही..! मामा तुम्ही मिळवलेलं ज्ञान, तुम्ही मिळवलेला अनुभव आम्ही सारे आत्मसात करायला, आमच्यात उतरवायला कमी पडलोय ही खंत मी आज या निमित्ताने आपल्याकडे व्यक्त करतो. तुमची उणीव आम्हाला सतत भासत राहील. आज तुम्ही आमच्यात नाहीत याचं दुःख जरूर आहे पण ते दुःखही आमचं तुमच्या गुणांप्रमाणे संयमाने, शांततेने आणि तुमच्या प्रगल्भ विचारधारेने आज ना उद्या कमी होईलही... पण मामा तुमचा तो गोड मृदू आवाज, तुम्ही आयुष्यभर मिळवलेल्या बऱ्या-वाईट अनुभवातून निर्माण झालेलं तुमचं एक विशिष्ट वलय, तुमचं सृजनशील असं व्यक्तिमत्व आमच्या साऱ्यांच्या मनावर कायम कोरलेलं आहे आणि ते अखेरपर्यंत अबाधित राहील..! मामा… तुम्हाला निर्वाण प्राप्त होवो…!!!                      नमोबुद्धाय! जय भिम!

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...