रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

         हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनुपस्थिती..! हाच तो दुःखाचा महापूर... आणि या दुःखद जड अंतःकरणाने एकवटून आलेला जनसमुदाय... एकाच्या दुःखातून सावरतो न सावरतो तोच दुसऱ्या आघाताने घायाळ आणि हतबल झालेला गोतावळा... आणि हेच ते चाफेरी बौद्धवाडीतील पवार घराणं... हेच ते दोस्तमंडळी... त्याच त्या दोन महामानवांच्या प्रतिमा... हेच ते उपासक आणि हाच तो पुण्यानुमोदनाचा शोक सभेचा कार्यक्रम... ज्या ठिकाणी आपण बसलोय तीच ती धरणी... आणि आपल्या डोक्यावरच तेच ते आकाश... बरोबर एक महिन्यापूर्वी जो क्षण आपण अनुभवला तोच पुण्यानुमोदनाचा क्षण आज आपण सर्वजण आणि हा माझा चाफेरी गाव पुन्हा अनुभवत आहे.



        लौकिक अर्थाने समाजात, वारंवार उच्चारले जाणारे जे शब्द रूढ आहेत त्याचबरोबर पुस्तकांमधून, कादंबऱ्या आणि चरित्रांमधून वारंवार सापडणारे शब्द म्हणजे नशीब, नियती, प्रारब्ध, तकदीर आणि हेच नशीब, नियती, प्रारब्ध, तकदीर हे शब्द तर प्रायोगिक आणि सामाजिक नाटकांमधून तर पावलोपावली ऐकायला मिळतात. नियती, नशीब, प्रारब्ध या शब्दांचा समावेश असलेल्या नाटकातील डायलॉग्जवर आरुढ होऊन आणि आपल्या आवाजातील चढउतारांच्या रंजक अभिनयाने रसिकांची मने जिंकणा-या एका अवलिया कलाकाराच्या नशीबी असं विलक्षण नाट्य घडावं..? आता हेच बघा ना, एक महिन्यापूर्वी अचानक आपला एकुलता एक मुलगा निघून जातो काय... त्यानंतर त्याच्या संसाराची झालेली परवड... आणि या एका महिन्यात खुद्द जन्मदाताच आपल्या मुलाच्या मागोमाग आपला देह त्यागतो काय... अतिशय नाट्यमय पद्धतीने घडलेले हे असे दोन्ही प्रसंग प्रत्यक्षात रंगभूमीच्या कलाकाराच्याच नशिबी यावेत; यात केवढी मोठी शोकांतिका आहे! रंगभूमीवर कलात्मकतेने लिलया घोंगावणारं मोहन पवार नावाचं 'तुफान' आज शांत पहुडलंय...


        दिवंगत मोहनदादाच्या कारकिर्दीचा आढावा घेताना नाट्यकलेचा उल्लेख केल्याविना पूर्णत्वास जाऊच शकत नाही. रंगभूमीलाच आपली कर्मभूमी मानणाऱ्या मोहनदादा यांनी पुऱ्या हयातीत नाटक कलेला अक्षरशः वाहून घेतले होते. गावोगावी होणारे नाटकांचे प्रयोग हे तुफान चालत असत.  'तुफान' या नावाचं नाटक आणि मोहनदादा हे एक समीकरणच होऊन गेलेलं. 


         मर्मबंधातल्या अभिनय काैशल्याच्या रंजक हिंदोळ्यावर झोके घेत घेत रसिकांची मने जिंकणारा हा अवलिया कलाकार म्हणून नावाजलेला आपला मोहनदादा मुंबईतल्या बहुतांश थिएटर्स आणि गावागावातले रंगमंच अगदी गाजवून सोडलेत. मात्र मोहनदादाच्या खऱ्या आयुष्यात याच नियतीने, याच नशिबाने आणि याच प्रारब्धाने कसा खेळ मांडला हे आपण सारे जण हाताशपणे पाहत आहोत. घडत असलेलं वास्तव कोणीही बदलू शकत नाही. मात्र आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये नशीब, नियती, प्रारब्ध अशा मायावी शब्दांना क्लीनचीट देऊन तथागतांनी कसोटीला उतरून आत्मविश्वासाने कर्मसिद्धांत जगासमोर आणला. आपल्या धम्मात नशीब, नियती, प्रारब्ध या शब्दांना थारा नाही; तर कर्म सिद्धांत खरा आहे. आता हा कर्म सिद्धांत म्हणजे काय यावर विस्तृतपणे भाष्य आपले बौद्ध उपासक, भंतेजी करू शकतात. मात्र मी सरळ साध्या शब्दात एका ओळीत याची व्याख्या करतो ती अशी की, मानवासहित अन्य कोणत्याही जीवसृष्टीस कुठलीही हानी न पोहोचवता आपले कार्य करणे म्हणजेच कर्मसिद्धांत होय.

        मोहनदादाचा मुलगा दि. वैभवच्या शोकसभेत माझे वडिलांनी मोहन दादा आणि त्याचे ज्येष्ठ बंधू जयवंत दादा यांना या पंचक्रोशीचे "नटसम्राट'' ही उपाधी देऊन या दोन्ही बंधूंबद्दल गौरोजगार काढले. गौरवाचे हे बोल खरेच आहेत. आमच्या चाफेरी गावाला नाट्यकलेची खरी ओळख ही या दोन बंधूंमुळेच म्हणजे जयवंतदादा आणि मोहनदादा यांच्यामुळेच झाली. नाटकाची पुस्तकं फाडणे म्हणजे काय? भुमिका आणि पात्रे म्हणजे काय? दिग्दर्शन म्हणजे काय? नेपथ्य, संगीत, प्रवेश, प्लॉट सीन आणि निर्माता म्हणजे काय हे सारे पैलू आम्हाला जे कळाले ते केवळ आणि केवळ या दोन बंधूंमुळेच. मी छाती ठोकपणे सांगू शकेन की, चाफेरी वा या पंचक्रोशीतील जे जे युवक ज्यांनी रंगभूमीवर प्रत्यक्ष काम करून आपली कला पेश केली आणि भविष्यात देखील जो कोणी येथे कलावंत घडेल त्याचे सारे श्रेय हे जयवंत दादा आणि मोहनदादा यांना जाते यात तीळ मात्र शंका नाही. नाट्यकलेची संस्कार घडणाऱ्या आमच्या दोन बंधूंचे आम्ही कायमच ऋणी आहोत. 

         दादांनी आयुष्यभरात नाटकाचे अनेक प्रयोग केले. त्यापैकी तुफान नावाच्या एक प्रयोगाला वरवडे येथील नाट्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. जयवंत पवार आणि मोहन पवार दिग्दर्शित, चंद्रकांत पवार निर्मितीत ह्या सुरेख कलाक्रुतीचा मेळ जुळून आला. त्यावेळीचा जो माहोल होता तो आजही डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. या प्रयोगाची रंगीत तालीम ही गावात झाली. त्यावेळी बाबुराव हिंदळेकर नावाचे जेष्ठ हार्मोनियम वादक यांनी एक गाणं वाजवलेलं माझ्या चांगलं स्मरणात राहिलं. नाटकाचा प्रयोग उत्तम झाला आणि दुसऱ्या दिवशी मुंबईतून आलेले कलाकार प्रयाण झाले. आम्ही सर्वजण मोहनदादा सहित जागरणीचे लोळत पडलो होतो. मी तसा वयाने लहान असलाे तरी या माेठ्या मंडळींच्या अवती-भाेवती घुटमळत असे. नाटकाला आणलेली हार्मोनियम तिथेच होती. मी ती पेटी उघडली आणि -

चंद्र धरेचा होता संगम, 

फुलवित तीच प्रभात, 

आजही कोजागिरीची रात 

या गाण्याची धून, त्यातलं इंट्रो म्युझिक आणि त्या गीतातल्या हरकती पेटीवर वाजवून दाखवल्या. मी ही वाजवलेली धुन ऐकून मोहनदादा अचंबित झाले. त्यांनी मला ती पुन्हा पुन्हा वाजवायला लावली. आता ऐकतोच आहे तर मीही सोडतोय काय. परत त्याच नाटकातील दुसरं गीत वाजून दाखवलं ते गीत म्हणजे-

 हास साजणा, गा रे साजणा, 

बहर आला प्रीतीचा बहर आला प्रीतीचा...

दाेन्ही गीतं ऐकून झाल्यावर त्यांनी शाबासकीची थाप पाठीवर मारून माझं खूप कौतुक केलं आणि "असाच सराव करीत रहा," असा प्रेरणादायी आशीर्वाद देखील दिला मला. त्या वयात जणू एखादा पुरस्कारच मिळाल्यासारखं वाटलं. या पुरस्काराची आज मात्र त्यांच्या विरहाने प्रकर्षाने आठवण येते. पुढे मोहन दादांच्या दिग्दर्शनाखाली मी लहान असून सुद्धा त्यांच्यासोबत २२ खेडी वाटद खंडाळा येथे, राजापूर तालुक्यामध्ये आणि या पंचक्रोशीतील गावागावांमध्ये काही नाटके वाजवण्याचं भाग्य मला लाभलं.. अर्थात त्यांचा माझ्यावरील दृढ विश्वास आणि जबाबदारी पेलताना मला त्यांचा जो सहवास लाभला तो माझ्या हृदयात फुलापरी आजही मी तो साठवून ठेवलाय. 

        मोहनदादा हे आज जन्म नाटक जगले हे म्हटलं तरी अतिशय होणार नाही. त्यांनी स्वतःचे प्लॉटसीन्स, प्रकाशयोजना इत्यादी सारे साहित्य तयार करून गावागावातून जो कोणी येईल त्याला खर्चाचा नफा-तोटा यांचा हिशेब न करता सढळ हस्ते आणि खुल्या मनाने ते प्रयोगासाठी देत असत. जीव ओतून दिग्दर्शन करीत असत; पण कधीही माणुसकी,  नाट्य संस्कृती आणि रंगभूमीशी फारकत घेतली नाही.


         मोहनदात्यांच्या मोबाईल फोनची रिंगटोन ज्यांनी ज्यांनी ऐकली ती रिंगटोन म्हणजे,

 नमन नटवरा विस्मयकारा,

आत्मविरोधी विपुल वखरा 

या संगीत मानापमान नाटकातील बालगंधर्वांनी गायलेली ही अजरामर नांदी. हीच नांदी आमच्या एकात नाटकात गायचे शिवधनुष्य मी उचलले. मी स्वतः पेटी वाजवून ती गायली देखील आणि माझ्यासोबत आमच्या सर्व सहकलाकारांनी कोरसने साथ मला दिली. नांदी खास होणार याचा अंदाज आम्हाला होताच; पण मोहनदादांनी जी दाद दिली ना त्यामुळे आमची छाती जणू ५६ इंच झाल्यासारखं वाटलं.  त्याचबरोबर सुधीर फडके यांनी वरच्या पट्टीतले गायलेले बुद्धगीत म्हणजे -

ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा ...

या गीतालाही आम्ही नांदीत रुपांतरीत करू दुसऱ्या प्रयोगाचे दरम्यान वाजवली. तोपर्यंत मोहन दादा हे गीत घेण्याचे धारिष्ट दाखवत नव्हते किंबहुना थोडेसे द्विधा मन:स्थितीत असतानाही नांदी फक्कड झाल्यावर त्यांनी माझं खूप भरभरून कौतुक केलं.


        मोहन दादाला एखादी गोष्ट भावली किती अगदी प्रांजळपणे समोरच्याकडे व्यक्त करून मोकळा होत असे; मनात कुठलाही दुजाभाव न ठेवता; स्वाभिमानाला न गोंजारता. खरा कलाकार हा असाच असतो. आपल्या कानाला, डोळ्यांना आणि हृदयाला लावणा-या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं तिथल्या तिथे काैतुक-गौरव करावा हे फक्त आणि फक्त खर्या कलाकाराला जमते. 


       प्रत्येक मनुष्य हा एक पुस्तकच असतो. पण जशी आपण पुस्तके वाचतो ना तशी माणसं देखील वाचावीत. वर वर ओबडधोबड वाटणारी, करारी दिसणाऱ्या माणसांच्या सानिध्यात गेल्यावरच त्या माणसाच्या आतील हृदय किती कोमल, किती प्रेमळ, किती त्यागी  आणि किती उदारमतवादी असते हे उमजून येते; अगदी वरून काटेरी असणाऱ्या फणसापरी! 


       आपणा सर्वांनाच एक चिंता लागून राहिली होती ती मोहनदादाचा नातू - इवल्याशा चैतन्याची. कारण त्याचे वडील दिवंगत वैभवच्या निधनाने व्याकुळ, अतिशोकाकूळ होऊन उद्विग्न झालेला हा मुलगा उपस्थित साऱ्यांच्या हृदयाला चीर देऊन गेला होता. वडील जाण्याने व्याकुळलेला चिमुकला त्याचे ते हृदय पिळून टाकणारे आर्त बोल सार्‍यांनीच ऐकले होते. बापाच्या विराहने मलून झालेला चेहरा आणि भेदरलेली भिरभिरती नजर आजही जशीच्या तशी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मोहन दादांची ही जेव्हा बातमी कानावर येताच तुमच्या आमच्या साऱ्यांच्या मनात एकच भीती त्वरित उत्पन्न झाली ती म्हणजे आता चैतन्याची काय हाल होतील? आपल्यालाही हा बालकाचा टाहो पहावेल का? कसा सामना हा इवलासा मुलगा करेल? असे एक ना अनेक प्रश्न डोकं भांडावून सोडत होते. पण म्हणतात ना, ज्याच्या पदरी संकट येतात त्या संकटांना सामना करण्याची शक्ती ही निसर्गाने देवू केलीय. बघा ना, आपल्या वडिलांच्या प्रेतावर आक्रोश करणारा हा चैतन्य अवघ्या एका महिन्यातच किती समजूतदार, किती प्रगल्भ आणि किती संयमी धीरगंभीर बनलाय. आज तो त्याच्या आजोबांच्या म्हणजेच मोहनदादाच्या अंतिम यात्रेत किती शांत, संयमी आणि समजूतदार वाटला‌. ज्या गोष्टीची आपल्याला चिंता लागून राहिली होती ती अगोदरच त्याच्या वर्तनात बदल घडवून उभी होती. कोवळ्या वयात इतकी समज तीही इतक्या विलक्षण गतीने यावी यात आहे ना चमत्कार! कुमार चैतन्यांने या पुढील प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगी अशी धीरोदात्त विवेक बुद्धीची कास धरून आपली प्रगती साधावी आणि आपल्या आयुष्याची सोनं करावं. त्याचबरोबर त्याचे आजोबा म्हणजे आमचे मोहनदादा यांच्या पावलावर पाऊल ठेवून रंगभूमीची सेवा करावी त्यासाठी आवश्यक असणारे पाठबळ हे कुटुंबीयांनी आणि विशेष करून पवार परिवाराने या चैतन्यावर लक्ष ठेवून मी असे सुचित करतो की, कुमार चैतन्याला एखाद्या नाट्यकलेच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन द्यावा. त्या प्रशिक्षणाने तो कलाक्षेत्रात आणखी प्राविण्य मिळवून तो पुढे आपल्या आजोबांसहित स्वतःचही नाव रोशन करेल अशाप्रकारच्या दिशेने त्याने मार्गक्रमणा करावी असं या निमित्ताने मी आज इथे मांडतो. त्याच बरोबर मोहन दादांच्या पश्चात त्यांची पत्नी, त्यांच्या तीन मुली आणि जावई या सर्वांना या प्रसंगातून सावरण्याचा बळ येवो. अशी सदिच्छा व्यक्त करतो.


       मोहनदादाला आयुष्याची जवळजवळ सात दशक लाभली म्हणजे सत्तरीचं आयुष्य लाभले. या मोहनदादाचा शोक करण्यापेक्षा मुलाच्या निधनानंतर अवघ्या एक महिन्यात आकस्मातपणे जाण्याने जो धक्का आहे तो अतीव असा आहे. आमच्या पवार परिवारात हा असा पहिलाच प्रसंग आहे.


       काहीशा भावविवश करणाऱ्या माझ्या भावना माझ्या 'मूकनायक' या ब्लॉगवर देखील शेअर केल्या असून त्याची लिंक मी माझ्या व्हाट्सअप स्टेटसवर जोडली आहे. यामध्ये मी माझ्या अंतर्मनातला कोल्हाहल उपसून स्वतःला काहीसं हलकं-फुलकं अनुभवत आहे. 


        तरी या माझ्या मोठ्या बंधूस-मोहनदादास मी जितेंद्र चंद्रकांत पवार माझे कुटुंबीयांमार्फत, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गावशकाखा चाफेरी यांचेवतीने आणि जनकल्याण कमिटीच्या वतीने मोहनदादा यास श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतो. मोहनदादास निर्वाण प्राप्त होवो!

बुधवार, १ मे, २०२४

वाद थांबवा, विहार वाचवा - एक चळवळ

 

"¾ÖÖ¤ü £ÖÖÓ²Ö¾ÖÖ, ×¾ÖÆüÖ¸ü ¾ÖÖ“Ö¾ÖÖ..."

        •ÖµÖ³Öß´Ö ²ÖÓ¬ÖãÓ®ÖÖê, ÛãúÞÖÖ ‹ÛúÖ“ÖÓ Æêü ÛúÖ´Ö ®Ö¾Æêü, ™üß´Ö¾ÖÛÔú ´ÆüÞÖÖ Æü¾ÖÓ ŸÖ¸... †Ö¯Ö»Öê ¯ÖÏŸµÖêÛúÖ“Öê ¾Ö›üᯙ µÖÖ “ÖÖ±êú¸üß ²Ö㬤ü ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ¸üÖ²Ö¸üÖ²Ö ¸üÖ²Ö»ÖêŸÖ... פü¾ÖÃÖ-פü¾ÖÃÖ³Ö¸ü ´ÖÖê»Ö´Ö•Öæ¸üß Ûúºþ®Ö ¸üÖ¡Öß-¸üÖ¡Öß †ÓÝÖ´ÖêÆü®ÖŸÖß®Öê †Ö¯Ö»µÖÖ»ÖÖ Ã¾Ö¯®Ö¾ÖŸÖ ¾ÖÖ™üÞÖÖ¸êü ×¾ÖÆüÖ¸ ŸµÖÖÓ®Öß ×®ÖÙ´Ö»Öêü... ŸµÖÖÓ“µÖÖ Ûú™üÖ“Öß, ŸµÖÖÝÖÖ“Öß †Ö×ÞÖ ŸµÖÖÓ“µÖÖŸÖ»µÖÖ ŸÖ£ÖÖÝÖŸÖÖÓ“µÖÖ ¯ÖÏê´ÖÖ“Öß •ÖÖÞÖß¾Ö †ÖÆêü... Ûú¤ü¸ü †ÖÆêü... †Ö¤ü¸ü †ÖÆêü... ÛúÖ¸üÞÖ µÖÖ †Ö¯Ö»µÖÖ ¾Ö›ü߻֬ÖÖ·µÖÖÓ®Öß •Ö¸ü ÛúÖ ×¾ÖÆüÖ¸ü ×®ÖÙ´ÖŸÖß“ÖÖ ×¾Ö“ÖÖ¸ü †Ó´Ö»ÖÖŸÖ“Ö †ÖÞÖ»ÖÖ ®ÖÃÖŸÖÖ ŸÖ¸ü Ûú¤üÖ×“ÖŸÖ †•Öæ®ÖÆüß “ÖÖ±êú¸üß¾ÖÖ›üß Æüß ²Ö㬤ü×¾ÖÆüÖ¸üÖ×¾Ö®ÖÖ ¸üÖÆüß»Öß †ÃÖŸÖß... ŸµÖÖÓ“Öê †Ö¯ÖÞÖÖÃÖ¾ÖÔ ŸÖ¹ýÞÖÖÓ¾Ö¸ü £ÖÖê¸ü ˆ¯ÖÛúÖ¸ü“Ö †ÖÆêüŸÖ...

        †Ö•Ö ‡ŸÖŒµÖÖ ¾ÖÂÖÖÕŸÖ ÛúÖêÞÖŸµÖÖ ÛúÖ ÛúÖ¸üÞÖÖ®Öê †ÃÖê®ÖÖ; ×¾ÖÆüÖ¸üÖÛú›êü ¤ãü»ÖÔõÖ —ÖÖ»ÖÓµÖ ÜÖ¸Óü... ¯ÖÞÖ †ÖŸÖÖ Æêü ŸÖ™üãֳÖÖ¾Ö šüÖ‡Ô šêü¾Öæ®Ö ®ÖÖÆüß “ÖÖ»ÖÞÖÖ¸ü... ×¾ÖÆüÖ¸üÖ“Öß †ÖÞÖÜÖß ÆüÖêÞÖÖ¸üß ¤îü®ÖÖ¾ÖãÖÖ ŸÖã´ÆüÖ-†Ö´ÆüÖ»ÖÖ ®ÖÖÆüß ²Ö‘Ö¾ÖÞÖÖ¸ü... †ÖŸÖÖ ¤üÖê®Æüß ¿ÖÖÜÖÖÓ“Öß Ûú¾Ö“ÖÛãÓú›ü»Öê ²ÖÖ•Öæ»ÖÖ ÃÖÖºþµÖÖ... †Ö¯ÖÞÖ“Ö †Ö¯Ö»Öê ×¾ÖÆüÖ¸ü ŸÖã´Ö“µÖÖ †Ö´Ö“µÖÖ Ûú»¯ÖÛúŸÖê®Öê ÃÖãÓ¤ü¸ü ÃÖ•Ö¾ÖãµÖÖ... ¾ÖÖ›üߟÖᯙ ¯ÖÏŸµÖêÛúÖ®Öê µÖÖ '†Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ‹Ûú ÆüÖê‰úµÖÖ...' '†Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ‹Ûú ÆüÖê‰úµÖÖ...'

        ÛúÖê™üÖÔŸÖ»µÖÖ ¾Ö×Ûú»ÖÖÓÛú¸ü¾Öê ×¾ÖÛúŸÖ ‘ÖêŸÖ»Ö껵ÖÖ †ŒÛú»Öê¯ÖêõÖÖ '“ÖãÛú³Öæ»Ö ªÖ¾Öß-‘µÖÖ¾Öß' Ûú¸üŸÖ †Ö¯ÖÞÖ“Ö †Ö¯Ö»Öê ´Ö®ÖÖê×´Ö»Ö®Ö ‘Ö›ü¾Öæ®Ö †ÖÞÖæµÖÖ. ×®Ö±úôû ³ÖÖÓ›üÞÖÖŸÖ †Ö¯Ö»µÖÖ µÖÖü ×¾ÖÆüÖ¸üÖ“ÖÖ ÜÖêôûÜÖÓ›üÖê²ÖÖ ®ÖÛúÖê ¾ÆüÖµÖ»ÖÖü. ÛúÖê™üÖÔ“ÖÖ ×¤ü»ÖÖ •ÖÖÞÖÖ¸üÖ ×®ÖÞÖÔµÖ ÆüÖ ÃÖ¾ÖÖÕ“µÖÖ“Ö ×ÆüŸÖÖ“ÖÖ ®ÖÃÖê»Ö ŸÖ¸ü ¤ãüÜÖÖ¾Ö»Öê»Öß ´Ö®Öê (´ÖÝÖ ŸÖß ÛúÖêÞÖŸµÖÖÆüß ¿ÖÖÜÖê“Öß †ÃÖÖêŸÖ) †Ö¯Ö»µÖÖ ®µÖÖµµÖÆüŒÛúÖÓÃÖÖšüß ÛúšüÖê¸ü ¯ÖÖ¾Ö»Öê ˆ“Ö»Ö»Öß •ÖÖÞµÖÖ“Öß ¤üÖ™ü ¿ÖŒµÖŸÖÖ ¾ÖÖ™üŸÖê. •Ö¸ü †ÖŸÖÖ“Ö µÖÖêÝµÖ ×®ÖÞÖÔµÖ ®ÖÖÆüß ‘ÖêŸÖ»ÖÖ ŸÖ¸ü †Ö¯ÖÞÖ Ûêú»Ö껵ÖÖ “ÖãÛúÖÓ“Öß —Öôû ¯Öãœêü †®ÖêÛú ¾ÖÂÖì †Ö¯Ö»µÖÖ»ÖÖ“Ö ²ÖÃÖŸÖ ¸üÖÆüᯙ †Ö×ÞÖ ´ÖÖÝÖ“Öß »ÖÆüÖ®Ö ×¯Öœüß ¤êüÜÖᯙ †Ö¯Ö»µÖÖ ¾ÖŸÖÔ®ÖÖÛú›êü ¯ÖÖÆüŸÖ †ÖÆêü“Ö; ×®ÖÞÖÔµÖ “ÖãÛú»ÖÖ ŸÖ¸ü Æüß ×¯Öœüß †Ö¯Ö»µÖÖ»ÖÖ ´ÖÖ±ú Ûú¸üÞÖÖ¸ü ®ÖÖÆüß µÖÖ“ÖÓ ¤êüÜÖᯙ ³ÖÖ®Ö †ÃÖæ ªÖ. ²ÖÖ•Öæ“µÖÖ ÝÖÖ¾ÖÖŸÖß»Ö ×¾ÖÛúÖê¯ÖÖ»ÖÖ ÝÖê»Ö껵ÖÖ ‘Ö™ü®ÖÖÓ“Öß ¯Öã®Ö¸üÖ¾Öé¢Öß †Ö¯Ö»µÖÖ ¾ÖÖ›üßŸÖ ´Öãôûß“Ö ÆüÖêüŸÖÖ ÛúÖ´ÖÖ ®ÖµÖê.           ´ÖÖ—µÖÖÃÖÖ¸üܵÖÖ †ÖÞÖÜÖß ÛúÖÆüß ´Öã»ÖÖÓ“ÖÓ ¤êüÜÖᯙ †ÃÖÓ“Ö ´ÖŸÖ †ÃÖæ ¿ÖÛúŸÖÓ. ®ÖãÃÖŸµÖÖ "¿ÖÖÜÖÖ-¿ÖÖÜÖÖ" Ûú¸üßŸÖ ²ÖÃÖ»ÖÖê ŸÖ¸ü ×¾ÖÆüÖ¸üÖ“µÖÖ ˆ¾ÖÔ׸üŸÖ ÝÖÖ³ÖÖ·µÖÖ“Öß ÃÖ㬤üÖ Ø“ÖŸÖÖ ¾ÖÖ™üŸÖê. ¤üÖê®Æüß ¿ÖÖÜÖÖ ²ÖÖ•Öæ»ÖÖ šêü¾Öæ®Ö ±úŒŸÖ †Ö×ÞÖ ±úŒŸÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß “ÖÖ±êú¸üß ²ÖÖü¾ÖÖ›üß ‹Ûú ÆüÖê¾ÖãµÖÖ. ×¾ÖÆüÖ¸üÖ“Öê ÛúÖ´Ö ¯ÖæÞÖÔ Ûú¹ýµÖÖ †Ö×ÞÖ ´ÖÝÖ ¾ÖÖ™ü»ÖÓ ŸÖ¸ü ¿ÖÖÜÖÖÓ“ÖÖ ×¾Ö“ÖÖ¸ü Ûú¹ýµÖÖ. †Ö¯ÖÞÖ ³ÖÖÓ›üŸÖ ŸÖ¸ü ®ÖÓŸÖ¸ü ¤êüÜÖᯙ ¸üÖÆæü... ¯ÖÞÖ †Ö¬Öß ×¾ÖÆüÖ¸ü ÆüÖê¾Öæ ªÖ.

          '¾Öî¸ü¾ÖÖß ×´Ö™üÞÖÖ¸ü ®ÖÖÆüß ²ÖÖüŸÖŸ¾Ö Æêü •ÖÖÞÖ...' †Öšü¾ÖÖ Æêü †Ö¯Ö»µÖÖ“Ö ‘ÖÖ¹ý²Öã¾ÖÖÓ®Öß ×»Öׯü»Öê»ÖÓ †£ÖÔ¯ÖÞÖæÔ ÝÖßŸÖ •Öê †Ö¯Ö»µÖÖ“Ö •Ö»Ö¿ÖÖ´Ö¬µÖê, †Ö¯Ö»µÖÖ“Ö ¸üÖ´Ö•Öß ÛúÖÓ²ÖôëûÃÖÆü ÃÖ¾ÖÖÕ®Öß“Ö •ÖÖê¿ÖÖŸÖ ÝÖÖµÖü»Öê»ÖÓ... ÜÖ¸Óü“Ö †Öšü¾ÖÖ...†Ö×ÞÖ Ûú¸üÖ ×¾Ö“ÖÖ¸ü ÃÖ¤ËüÃÖ¤Ëü ×¾Ö¾ÖêÛúÖ»ÖÖ •ÖÖÝÖéŸÖ šêü¾Öæ®Ö ¯Öã®ÆüÖ ‹Ûú¤üÖ †Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß...!

        '¾ÖÖ¤ü £ÖÖÓ²Ö¾ÖÖ, ×¾ÖÆüÖ¸ü ¾ÖÖ“Ö¾ÖÖ' µÖÖ “Öôû¾Öôûß«üÖ¸êü †Ö•Ö ÃÖ¾ÖÖÕ®ÖÖ ´Öß †Ö¯Ö»µÖÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ÃÖÖ¤ü ‘ÖÖ»ÖßŸÖ †ÖÆêü... £ÖÖÓ²Ö¾ÖÖ ŸÖê ×¾ÖŸÖã™ü... ™üÖÛæú®Ö ªÖ ŸÖß ¯Öã¾ÖÔ¤æü×ÂÖŸÖ ³ÖÖ¾Ö®ÖÖ... ˆ®´Öôæû®Ö ™üÖÛúÖ ŸµÖÖ †™üß-¿ÖŸÖ⓵ÖÖ Ø³ÖŸÖß... ¤üÖê®Æüß ¿ÖÖÜÖÖÓ“µÖÖÆüß ¯Ö×»ÖÛú›êü •ÖÖ‰ú®Ö... ±úŒŸÖ †Ö×ÞÖ ±úŒŸÖ ×¾ÖÆüÖ¸üÖÜÖÖ»Öß ‹Ûú ¾ÆüÖ... •ÖßÞÖÔ ×¾ÖÆüÖ¸üÖÃÖÖšüß ‹Ûú ¾ÆüÖ...

        ´Öß ‹Ûú ¾ÖÖ›üߟֻÖÖ“Ö ÃÖÖ´ÖÖ®µÖ ´Öã»ÖÝÖÖ - †Ö¯Ö»ÖÖ ²ÖÓ¬Öæ †Ö×ÞÖ ×¾Ö¯Ö¿µÖ®ÖÖ ÃÖÖ¬ÖÛú ´ÆüÞÖæ®Ö Æêü †Ö¯ÖÞÖÖÃÖ †Ö¾ÖÖÆü®Ö Ûú¸üßŸÖ †ÖÆêü; ´ÖÖ—ÖÓ Ã¾ÖŸÖ:“ÖÓ ¾ÖîµÖ׌ŸÖÛú ´ÖŸÖ †Ö¯Ö»µÖÖÃÖ´ÖÖê¸ü ´ÖÖÓ›ü»ÖÓ †ÖÆêü. ÛúÖêÞÖŸµÖÖÆüß ¿ÖÖÜÖê“ÖÖ µÖÖ´Ö¬µÖê †ÓŸÖ³ÖÖÔ¾Ö ®ÖÖÆüß Æêü Ûéú¯ÖµÖÖ »ÖõÖÖŸÖ ‘µÖÖ. †Ö¯Ö»µÖÖ ‹Ûú´ÖêÛúÖÓ“µÖÖ ¯ÖÏןÖÃÖÖ¤üÖ®Öê †Ö×ÞÖ ÃÖÆüÛúÖµÖÖÔ®Öê ™üß´Ö¾ÖÛÔú Ûúºþ®Ö ÜÖ¸üß †Ö¤ü¿ÖÔ¾ÖŸÖ †¿Öß ÛÎúÖÓŸÖß ‘Ö›ü¾ÖæµÖÖ... †Ö•Öæ²ÖÖ•Öæ“µÖÖ ÝÖÖ¾ÖÖÓ®ÖÖÆüß †Ö¯Ö»ÖÖ †Ö¤ü¿ÖÔ ¤üÖÜÖ¾Öæ®Ö ¤êü¾ÖæµÖÖ... †Ö¯Ö»µÖÖ ÃÖÆüÛúÖµÖÖÔ“µÖÖ ¯ÖÏןÖõÖêŸÖ..!

                                                                                                    -  ו֟Öë¦ü ¯Ö¾ÖÖ¸ü

ÃÖÓ¯ÖÛÔú - 9765039979



गुरुवार, ११ मे, २०२३

निर्मला देवींच्या जाहीरातीवरील समिक्षा

 निर्मला देवींच्या जाहीरातीवरील समिक्षा

(नातेवाईकांनी व्हाट्सअप वर पाठवलेल्या हॅन्डविला त्यांना दिलेले उत्तर)



     सहजयोग गुरु परमपूज्य माताजी निर्मला देवी यांच्या अध्यात्माबद्दल आदर आहेच. त्यांच्या आयुष्यात शांततेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे भान ठेवून तुम्ही पाठवलेल्या पॅम्प्लेटमध्ये काही त्रुटी, उणीवा आढळून आल्या त्याबद्दलचे काही मुद्दे मांडू इच्छितो. 

बौद्ध धम्माच ब्रीद असलेल्या 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' यातील 'सुखाया' असं चुकीचं लिहीलं गेल्याचं दिसून येते. 

दुसरं म्हणजे बाबासाहेबांचं लिहिलेलं चुकीचं नाव- बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर असे नसून एकतर डॉ. बी. आर. आंबेडकर तरी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी लिहावयास हवे होते. 

पॅम्प्लेट मधील लिखाण हे गुगलवरच्या विकिपीडिया मधून मिळवल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे ते वृक्ष वाटते. 

बाबासाहेबांना कधीही विभूती मान्य नसून ते आधुनिक विचारसरणीचे असल्यामुळे पुराणातील व्यास, वाल्मिकी, राम इत्यादींचे अस्तीत्व नाकारले. त्यांनी हिंदू देवतांची उपासना करणार नाही अशी 22 प्रतिज्ञांमध्ये 1956 च्या बौध्द धम्माच्या दीक्षा समारंभात शपथ घेतली व आपल्या साऱ्या अनुयायांनाही दिली. त्याचबरोबर सर्व बहुजन समाज वंचित पीडित असलेल्या स्त्रिया (यामध्ये ‍ख्रीश्चन-अल्पसंख्यांक असलेल्या निर्मला मातेचाही समावेश आहे) यांना सन्मान देऊन संविधान रूपाने जणू त्यांना ढालच सुपूर्द केली. मात्र आजच्या उच्च पदावर गेलेल्या स्त्रिया यांना बाबासाहेबांच्या बहुमोल कार्याची जाणीव नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. 

पॅम्प्लेट वरील मातेचा स्वतःचा सुरूवातीला भव्य दिव्य फोटो, स्वत:ची जाहीरात आणि त्याखाली महामानव महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचे छोटे फोटो आणी त्यांच्याबद्दलची २/४ वाक्यांची जुजबी माहीती यामधला भेद हा अनपेक्षीत आहे. 

पॅम्प्लेटमध्ये माताजींचे वडील पि के राव साळवे हे अत्यंत "उच्च दर्जाचे" स्वातंत्र्यसैनिक होते असे म्हटले आहे. खरे तर स्वातंत्र्यसैनिक यांना "उचनीचतेचा दर्जा" देऊन आपण त्यांच्या हौताम्याचं, त्यांच्या योगदानाचं अवमूल्यन केल्यासारखे आहे. स्वातंत्र्यसैनिक हा शेवटच्या रांगेतला असो वा प्रथम क्रमांकाचा; प्रत्येकाच्या नसानसात देश प्रेम, त्याग ठासून भरलेला असतो. त्यामुळे स्वातंत्र्यसैनीकाला कोणताही दर्जा देणे हे सगळ्यात घातक आहे.

बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे. ज्याला धर्म आणि धम्म या मधला फरक कळत नाही तो अशी गफलत करू शकतो हे मी सांगावयाची गरज नाही. 

माताजींचे पिताश्री पी के राव साळवे समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक असतीलही. कायद्याचे शिक्षण ही घेतले असेल, 14 भाषा ही त्यांना अवगत असतीलही. माताजींच्या बायोग्राफीत म्हटल्याप्रमाणे "Her father, a talented lawyer and close associate of Mahatma Gandhi, was a member of the Constituent Assembly of India and helped write India's first constitution." मात्र पॅम्लेटमधील विधानानुसार संविधान सभेच्या सदस्यांच्या यादीत पी के राव साळवे असे नाव कुठेही नमूद नाही ‍ कींबहुना बाबासाहेबांना संवीधान लिहावयास मदत केली. ही सर्व विधाने अतिशय हास्यास्पद आहेत. आपल्या माहीतीसाठी संविधान सभेच्या सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे देत आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधान समितीच्या एकूण २८४ सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत.

ओ.वी.मुदलियार अलगेसन, अम्मु स्वामीनाथन, एम ए अयंगार, मोटूरि सत्यनारायण, दक्षयनी वेलायुधन, दुर्गाबाई देशमुख, एन. गोपालस्वामी अयंगर, डी. गोविंदा दास, जेरोम डिसूजा, पी. कक्कन, टी एम कलियन्नन गाउंडर, लालकृष्ण कामराज, वी. सी. केशव राव, टी. टी. कृष्णमाचारी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एल कृष्णास्वामी भारती, पी. कुन्हिरामन, मोसलिकान्ति तिरुमाला राव, वी. मैं मुनिस्वामी पिल्लै, राजा एम अन्नामलाई मुत्तैया चेट्टियार, वी. नादिमुत्तु पिल्लै, एस नागप्पा, पी. एल नरसिम्हा राजू, पट्टाभि सीतारमैया, सी. पेरुमलस्वामी रेड्डी, टंगुटूरी प्रकाशम, एस एच. गप्पी, श्वेताचलपति रामकृष्ण रंगा रोवा, आर लालकृष्ण शन्मुखम चेट्टि, टी. ए रामलिंगम चेट्टियार, रामनाथ गोयनका, ओ पी. रामास्वामी रेड्डियार, एन जी रंगा, नीलम संजीव रेड्डी, शेख गालिब साहिब, लालकृष्ण संथानम, बी शिव राव, कल्लूर सुब्बा राव, यू श्रीनिवास मल्लय्या, पी. सुब्बारायन, चिदम्बरम् सुब्रह्मण्यम्, वी सुब्रमण्यम, एम. सी. वीरवाहु, पी. एम. वेलायुधपाणि, ए क मेनन, टी. जे एम विल्सन, मोहम्मद इस्माइल साहिब, के. टी. एम. अहमद इब्राहिम, महबूब अली बेग साहिब बहादुर, बी पोकर साहिब बहादुर, वी. रमैया, रामकृष्ण रंगा राव, बालचंद्र महेश्वर गुप्ते, हंसा मेहता, हरिविनायक पटस्कर, बाबा साहब डॉ.भीमराव अम्बेडकर, यूसुफ एल्बन डिसूजा, कन्हैयालाल नानाभाई देसाई, केशवराव जेधे, खंडूभाई कसनजी देसाई, बाळासाहेब गंगाधर खेर, मीनू मसानी, कन्हैयालाल माणिकलाल मुंशी, नरहर विष्णु गाडगील, एस निजलिंगप्पा, एस. के. पाटिल, रामचंद्र मनोहर नलावडे़, आर आर दिवाकर, शंकरराव देव, गणेश वासुदेव मावलंकर, विनायकराव बालशंकर वैद्य, बी एन मुनवली, गोकुलभाई भट्ट, जीवराज नारायण मेहता, गोपालदास अंबैदास देसाई, प्राणलाल ठाकुरलाल मुंशी, बी एच. खरडेकर, रत्नाप्पा कुंभार, वल्लभ भाई पटेल, अब्दुल कादर मोहम्मद शेख, आफताब अहमद खान विनायक राणे , पंजाबराव देशमुख, सं.दि.परब, मनमोहन दास, अरुण चन्द्र गुहा, लक्ष्मी कांता मैत्रा, मिहिर लाल चट्टोपाध्याय, काफ़ी चन्द्र सामंत, सुरेश चंद्र मजूमदार, उपेंद्रनाथ बर्मन, प्रभुदयाल हिमतसिंगका, बसंत कुमार दास, रेणुका राय, हरेन्द्र कुमार मुखर्जी, सुरेंद्र मोहन घोष, श्यामाप्रसाद मुखर्जी, अरी बहादुर गुरुंग, आर ई. पटेल, क्षितिज चंद्र नियोगी, रघीब अहसान, सोमनाथ लाहिड़ी, जासिमुद्दीन अहमद, नज़ीरुद्दीन अहमद, अब्दुल हलीम गज़नवी, डॉ भीमराव अम्बेडकर, अजीत प्रसाद जैन, अलगू राय शास्त्री, बालकृष्ण शर्मा, बंशीधर मिश्र, भगवान दीन, दामोदर स्वरूप सेठ, दयाल दास भगत, धरम प्रकाश, ए धरम दास, रघुनाथ विनायक धुलेकर, फिरोज गांधी, गोपाल नारायण, कृष्ण चंद्र शर्मा, गोविंद बल्लभ पंत, गोविंद मालवीय, हरियाणा गोविंद पंत, हरिहर नाथ शास्त्री, हृदय नाथ कुन्ज़रू, जसपत राय कपूर, जगन्नाथ बख्श सिंह, जवाहरलाल नेहरू, विजय लक्ष्मी पंडित, जोगेन्द्र सिंह, जुगल किशोर, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, बी वी. केसकर, कमला चौधरी, कमलापति त्रिपाठी , आचार्य कृपलानी, महावीर त्यागी, खुरशेद लाल, मसुरियादीन, मोहनलाल सक्सेना, पदमपत सिंघानिया, फूल सिंह, परागी लाल, पूर्णिमा बनर्जी, पुरुषोत्तम दास टंडन, हीरा वल्लभ त्रिपाठी, राम चंद्र गुप्ता, शिब्बन लाल सक्सेना, सतीश चंद्रा, जॉन मथाई, सुचेता कृपलानी, सुंदर लाल, वेंकटेश नारायण तिवारी, मोहनलाल गौतम, विश्वम्भर दयालु त्रिपाठी, विष्णु शरण दुबलिश, बेगम ऐज़ाज़ रसूल, चौधरी हैदर हुसैन, हसरत मोहानी, अबुल कलाम आजाद, नवाब मुहम्मद इस्माईल खान, रफी अहमद किदवई, मौलाना हिफ्ज़ुर्हमान स्योहारवी, बशीर हुसैन जैदी, रणबीर सिंह हुड्डा, बख्शी टेक चन्द, पंडित श्रीराम शर्मा, जयरामदास दौलताराम, ठाकुरदास भार्गव, बिक्रमलाल सोंधी, यशवंत राय, लाला अचिंत राम, नंद लाल, सरदार बलदेव सिंह, गुरमुख सिंह मुसाफिर, सरदार हुकम सिंह, सरदार भूपिंदर सिंह मान, सरदार रतन सिंह लौहगढ़, सरदार रणजीत सिंह, अमिय कुमार घोष, अनुग्रह नारायण सिन्हा, बनारसी प्रसाद झुनझुनवाला, भागवत प्रसाद, Boniface लाकड़ा, ब्रजेश्वर प्रसाद, चंडिका राम, लालकृष्ण टी. शाह, देवेंद्र नाथ सामंत, डुबकी नारायण सिन्हा, गुप्तनाथ सिंह, यदुबंश सहाय, जगत नारायण लाल, जगजीवन राम, जयपाल सिंह मुंडा, कामेश्वर सिंह, कमलेश्वरी प्रसाद यादव, महेश प्रसाद सिन्हा, कृष्ण वल्लभ सहाय, रघुनंदन प्रसाद, राजेन्द्र प्रसाद, रामेश्वर प्रसाद सिन्हा, राम नारायण सिंह, सच्चिदानन्द सिन्हा, सारंगधर सिन्हा, सत्येन्द्र नारायण सिन्हा, बिनोदानंद झा, पी. लालकृष्ण सेन, श्रीकृष्ण सिंह, श्री नारायण महता, श्यामनन्दन सहाय, हुसैन इमाम, सैयद जाफर इमाम, एस.एम.लतीफुर्रहमान, एम. ताहिर, तजमुल हुसैन, चौधरी आबिद हुसैन, हरगोविन्द मिश्र, गुरु अगमदास, रघु वीर, बड़ेभाई ठाकुर ललोनी, राजकुमारी अमृत कौर, नगला भौगरा (कामा) , भगवंतराव मंडलोई, बृजलाल बियाणी, बैरिस्टर ठाकुर छेदीलाल, प. किशोरी मोहन त्रिपाठी, सेठ गोविंद दास, डाँ.सर हरिसिंह गौर, हरि विष्णु कामथ, हेमचन्द्र जगोबाजी खांडेकर, घनश्याम सिंह गुप्ता, लक्ष्मण श्रवण भाटकर, पंजाबराव शामराव देशमुख, रविशंकर शुक्ल, आर लालकृष्ण सिधवा, शंकर त्र्यंबक धर्माधिकारी, फ्रैंक एंथोनी, काजी सैयद करीमुद्दीन, गणपतराव दानी, आर.एल. मालवीय, रामप्रसाद पोटाई, निबारन चंद्र लास्कर, जेम्स जॉय मोहन निकोल्स रॉय, धरणीधर बसु मतरी, गोपीनाथ बोरदोलोई, कुलाधौर चालिहा, रोहिणी कुमार चौधरी, मुहम्मद सादुल्ला, अब्दुल रऊफ, विश्वनाथ दास, कृष्ण चन्द्र गजपति नारायण देव, हरेकृष्ण महताब, लक्ष्मीनारायण साहू, लोकनाथ मिश्र, नंदकिशोर दास, राजकृष्ण बोस, शांतनु कुमार दास, लाल मोहन पति, एन माधव राव, राज कुंवर, शारंगधर दास, युधिष्ठिर मिश्र, देशबंधु गुप्ता, मुकुट बिहारी लाल भार्गव, सी. एम. पूनाचा, के.सी.रेड्डी, के.हनुमन्तैया, टी. सिद्धलिंगैया, आर गुरुव रेड्डी, एस वी कृष्णमूर्ति राव, एच. सिद्धवीरप्पा, टी. चेन्निया, शेख मुहम्मद अब्दुल्ला, मोतीराम बैगरा, मिर्जा मोहम्मद अफजल बेग, मौलाना मुहम्मद सईद मसूदी, पट्टम ताणु पिल्लै, आर शंकर, पी. टी. चाको, पानमपिली गोविन्द मेनन, एनी मस्करीन, पी. एस. नटराज पिल्लई, के ए मोहम्मद, विनायक सीताराम सरवटे, बृजराज नारायण, गोपीकृष्ण विजयवर्गीय, राम सहाय, कुसुम कांत जैन, राधवल्लभ विजयवर्गीय, सीताराम एस जापू, बलवंतराय मेहता, जयसुख लाल हाथी, ठक्कर बापा, चिमनलाल चकूभाई शाह, सामलदास गांधी, जयपुर से वी. टी. कृष्णमाचारी और हीरालाल शास्त्री, खेतड़ी से सरदार सिंह, बीकानेर से के एम पण्णिकर‌ और जसवंत सिंह, भरतपुर से राज बहादुर, उदयपुर से माणिक्य लाल वर्मा और बलवंत सिंह मेहता, शाहपुरा से गोकुल लाल असावा, अलवर से रामचंद्र उपाध्याय, कोटा से दलेल सिंह, जोधपुर से जय नारायण व्यास और सी एस वेंकटाचारी सर टी वी राघवाचर्या(उदयपुर), अवधेश प्रताप सिंह, शम्भूनाथ शुक्ल, राम सहाय तिवारी, मन्नूलालजी द्विवेदी, भैयालाल सिंह, हिम्मत सिंह लालकृष्ण माहेश्वरी, गिरिजा शंकर गुहा, रवि मैहरा, लाल सिंह, भवनजी अर्जुन खिमजी, यशवंत सिंह परमार.

पॅम्प्लेटमध्ये माताजींचे वडील गांधीवादी होते असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे बाबासाहेबांशी मैत्री असणे ही गोष्टच अनाकलनीय आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांचे माताजींच्या घरी येणे-जाणे (?) किंवा माताजींना लाभलेला बाबासाहेबांचा सहवास(?) या गोष्टी म्हणजे फेकाफेकीचा कळसच झाला. कारण बाबासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये माताजी किंवा त्यांचे वडील पि के राव साळवे यांचा कुठेही उल्लेख नाही. भले, गांधींनी माताजींना नेपाळी म्हणायचे ते म्हणो. माताजींचे वडील गांधीवादी होते. त्यामुळे गांधींचा सहवास लाभणे यात काही शंकाच नाही. किंवा असाही तर्क निघतो की, गांधींची हत्या 30 जानेवारी 1948 झाली त्याच्या आदल्या दिवशी गांधी माताजींना लाडाने नेपाळी म्हणाले. मग गांधींच्या हत्येनंतर माताजी व त्यांचे वडील हे गांधीवादी न रहाता आंबेडकरवादी झाले की काय?

एखाद्या महापुरुषाचं नाव अख्ख्या जगभर प्रसिद्ध झालेलं असतं. मग या समाजात काही लोकांची विकृती अशी असते की या महामानवाच्या नात्याशी आपला संबंध जोडावयाचा आणि आपली खाली असलेली प्रतिष्ठा थोडी आपणच स्वतःहून उंचवावयाची; हा एक बालिश प्रयत्न असतो.  त्याचप्रमाणे माताजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या नावाला त्यांचा सहवास लाभल्याचं भासवून आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे. 

बाबासाहेब माताजींच्या घरी जात असत असाही केविलवाणा प्रयत्न वाचून वाईट वाटतं. थोडक्यात, बाबासाहेबांच्या शालूला स्वतःचं लुगडं लावून पुढे करण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद नाहीतर आणि काय? 

बौद्ध धर्म आणि सहजयोग या मुद्द्यांमध्ये कुंडलिनी जागृत होण्याचा मुद्दा मांडला आहे. मात्र तथागतांनी म्हणजेच गौतम बुद्धांनी अशा कुंडलिनी चक्राचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यांनी ध्यानही केलं नाही. त्यांनी तपश्चार्याही केली नाही. त्यांनी तपही केले नाही. त्यांनी फक्त आणि फक्त एकाग्रतेने चिंतन केले. आपण गफलत हीच करतो. ध्यान, तपश्चर्या आणि चिंतन, मनाची एकाग्रता हे सगळं एकाच मोळीत बांधायचा प्रयत्न करतो पण तो खरा नव्हे. 

स्वतःला जागृत करा. "अत्त दीप भव" असं बुद्धाने म्हटलंय. प्रेम, करुणा, दया वाटा. जग आपोआप सुंदर होईल. या अनेक बुद्धांच्या शिकवण्या इतर लोक आपापल्या प्रवचनामध्ये कॉपी करून ते स्वतःच्या नावावर खपवतात हा अनेक वर्षांचा इतिहास आहे.

माताजींचं एक वाक्य मात्र पटलं. ज्यांच्या अंत:करणात करुणा नाही त्यांनी समाजकार्य करू नये ज्यांनी समाजकार्य केले नाही त्यांनी राजकारणात जाऊ नये.

बौद्ध धम्मात फक्त बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संगम शरणम गच्छामि याचा अर्थ सांगितला की धम्म संपत नाही. बौद्ध धम्म हा विशाल समुद्रासारखा आहे. केवळ या त्रिसूत्रींचा अर्थ सांगून धम्म समजून घेता येत नाही. 

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही इतिहास या पॅम्प्लेटमध्ये केवळ दोन-चार ओळींमध्ये मांडून त्यांच्या कार्याचा आढावा इतका शॉर्टकट कधीच पाहिलेला नसावा. हे पॅम्प्लेट काहीसं जाहिरातबाजीचं असल्याचं जाणवतं.

मी हे ही जाणतो की, हे पॅम्लेट काही खुद्द माताजींनी लिहीलेलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा महिमा गौरवीण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. पण त्यातही एकसूत्रता नाही. असो...

-  जितेंद्र पवार

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

आश्विनी..!

आश्विनी..! 


    जिचं माहेर आणि सासर हे एकाच ठिकाणी जोडून ठेवणारी... घराला घरपण देणारी... नात्याने लहान असूनही मोठमोठाल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेळणारी

.. समोर संकटं उभी ठाकलेली असूनही चेहऱ्यावर सदा नितळ हसू बाळगणारी... बोलघेवडी... निर्मळ मनाची... मायाळू... दयाळू... जिच्या वावरण्यानं-अस्तित्वानं घरातील चैतन्य जागृत करणारी... लाभलेल्या अल्पायुष्यामध्ये आम्हा प्रत्येकात प्रेमाचे, आपुलकीचे, मायेचे, ऋणानुबंधाचे सडे शिंपडीत नंदनवन फुलवणारी... स्वतःच्या त्यागाची आहुती देत जी काही जडणघडण निर्माण केली... अशी ही आमची सून... आश्विनी..! हिचा पुण्यानुमोदन-शोकसभा करण्याची वेळ आमच्यावर यावी यापेक्षा आणखी दुर्दैव ते काय?

       ज्या आक्राळ-विक्राळ आजारांना तिला गिळंकृत केलं त्या आजाराचा सामना तिने जीवनाच्या अखेरपर्यंत केला खरा; पण शेवटी शोकांतिका ठरली. आमच्या विनोदला ह्या असल्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ ही काही नवी नाही. मोठा भाऊ व आमचा मोठा भाचा दिवंगत प्रमोदलाही वाचवण्यासाठी आणि आज त्याच्या पत्नीलाही वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आमच्या विनोदला - त्याच्या अविरत प्रयत्नांना यश आलं नाही.

       आज या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने हेच सांगणे आहे की, आजपर्यंत तू अनेक संकटे झेललीस... त्यात तुला नोकरीही गमावी लागली... स्वतःकडे दुर्लक्ष करून तू अश्विनीसाठी झटलास... मात्र आता तुला या सर्वांच्या परे जाऊन तुझ्या गोंडस मुलीसाठी-विनंतीसाठी पुन्हा नव्याने आणि जोमाने आयुष्याला सुरुवात कर. तुझ्या पंखात बळ येवो आणि पुन्हा नव्याने उत्तुंग अशी भरारी घे..! 

      आज आम्हा प्रत्येकाच्या मनात जीचे कधीही विस्मरण होऊ शकत नाही अशा या आमच्या सुनेला-अश्विनीला निर्माण प्राप्त होवो!!!

       मी चंद्रकांत पवार चाफेरी माझे कुटुंबीयंतर्फे, भारतीय बौद्ध महासभा गावशाखा चाफेर आणि जनकल्याण कमिटी यांच्यावतीने आमच्या या सुनेला आदरांजली व श्रद्धांजली अर्पण करतो. नमोबुद्धाय - जय भीम 



गुरुवार, ५ मे, २०२२

होय, मला भिम पावला...

अमानुषतेचा फास सोडविण्या

पूर्वजांचा माझ्या जो धावला...

होय, मला भिम पावला... 

होय, मला भिम पावला...


हजारो वर्षे विद्येपासून वंचित असलेला मी... 

स्वाभिमान-आत्मसन्मानाचा लवलेश नसलेला मी... 

दोन पाय दोन हात आणि हा देह आजवर जनावरात जगलेला मी...

सनातन्यांची अंध:कारमय गुलामी करीत आलेला मी... 

आणि नव्या उमेदीचं, स्वाभिमानाचं जग असतं याची जाणीव नसलेला मी... 

पिचलेल्या, दबलेल्या, भेदरलेल्या अन् दिडमुग झालेल्या आवाजातला मी...

अखेर फोडला एकदाच असा टाहो की, 

आक्रोशाने जातीबाटीचा हा देश आणि सहिष्णूवाद्यांची उडविली तारांबळ

घेऊन लेखणी अन अंधार ज्वलंत शब्दांची 

केला एल्गार सत्याग्रहाचा उडविली झोप काळ्या रामाची पण खितपत पडलेल्या घोर अन्यायाची...


नागवंशीयाचा जन्म माझा 

घेऊन दीक्षा धम्माची 

शिकलो सवरलो मिळवूनि त्या शिष्यवृत्त्या 

भोजन केले सौख्याचे भटाबामणाच्या मांडीला बसून...


जमीन-अस्मानाचा हा कायापालट 

नाही एका रात्रीत जाहला... 

होय मला भीम पावला...

               

अमानुषतेचा फास सोडविण्या

पूर्वजांचा माझ्या जो धावला...

होय, मला पावला... 

होय, मला भीम पावला...

                           -  जितू

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...